शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांना डोळ्यांचे आजार !

By admin | Updated: May 29, 2015 01:59 IST

वाढते तापमान धोकादायक; पश्‍चिम व-हाडातील १५ लाख जनावरांना उष्णतेचा फटका.

नाना हिवराळे / खामगाव (जि. बुलडाणा):हवामानातील बदल आणि वाढत्या उष्णतेचा मनुष्याबरोबर जनावरांनाही फटका बसत आहे. गत आठवड्यातील ४५ अंश सेल्सिअसपेक्षा वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे. यामुळे पश्‍चिम वर्‍हाडातील १५ लाख जनावरांसाठी वाढते तापमान धोकादायक ठरत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिकांचे बळी जात आहे. यावर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या चार्‍याची नासाडी झाली आहे. पुरेसा चारा जनावरांना उपलब्ध नसल्याने जनावरांमध्ये ह्यएह्ण व्हिटॅमिनची कमी जाणवत आहे. पोषक चार्‍याअभावी जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. गत आठवड्यापासून जनावरांना डोळ्याचे आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनावरांच्या डोळ्यातील पाणी गळणे, बुबुळावरील पापुद्रा पांढरा होणे, जनावरे अशक्त आदी लक्षणे आढळून आली आहेत. लहान जनावरांप्रमाणेच मोठय़ा जनावरांचाही यामध्ये समावेश आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला जिल्हय़ात २ लाख ७७ हजार ८८१ जनावरे, वाशिम ३ लाख ४ हजार ३४७ तर बुलडाणा जिल्हय़ात १0 लाख १३ हजार ६८८ जनावरांचा समावेश आहे. जनावरांच्या डोळ्याच्या वाढत्या आजारामुळे पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत. डोळ्याच्या आजारापासून वाचविण्यासाठी जनावरांना पोषक व पुरेसा चारा, व्हिटॅमिन ह्यएह्ण ची पावडर खाऊ घालणे, डोळे स्वच्छ पाण्याने धुणे व कपड्याने पुसून काढणे तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यात औषधी टाकणे आदी उपाय करणे गरजेचे आहे. यासंदर्भात तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ एन एच बोहरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जनावरांमध्ये डोळे सातत्याने गळणे, बुबुळावर पांढरा पापुद्रा निर्माण होणे अशी लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी त्वरित जनावरांना तपासणीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करण्याची गरज व्यक्त केली.

*.तर जनावरांना अंधत्व !

       वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मनुष्य विविध प्रकारच्या उपाययोजना करतो; मात्र जनावरांना २४ तासही उघड्यावर राहावे लागते. जनावरांच्या शरीराचे तापमान सरासरी १0१ अंश सेल्सिअस राहते; परंतु वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान वाढून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. बुबळ पांढरे होऊन रात्रंदिवस त्यामधून पाणी गळते. यावर वेळीच उपाय झाला नाही तर जनावरांना अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पशुधन विभागाचे म्हणणे आहे.