शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्चावरील बीडीओंची निगराणी हटविली

By admin | Updated: March 12, 2017 02:16 IST

आमचं गाव, आमचा विकास योजनेचा खर्च रखडला.

अकोला, दि. ११- आमचं गाव, आमचा विकास आराखड्यातील कामांसाठी १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे अधिकार आणि निधी ग्रामपंचायतींना देण्यात आला. त्या कामांना तांत्रिक मंजुरी आणि देयक काढताना गटविकास अधिकार्‍यांची स्वाक्षरी असल्याशिवाय निधी खर्च करण्यावर जिल्हा परिषदेने घातलेले निर्बंध अखेर मागे घेण्यात आले. तसे पत्र पंचायत समित्यांना मंगळवारी पाठविण्यात आले. केंद्र शासनाकडून मिळणारा वित्त आयोगाचा निधी ह्यआमचं गाव-आमचा विकासह्ण आराखड्यातील कामांवर खर्च करता येतो. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २0१५-१६ ते २0१९-२0 या काळात विकास आराखड्यातील कामे करता येतात. त्यासाठी वित्त आयोगाच्या लगतच्या दोन वर्षांंतील निधीचे वितरणही झाले आहे. तो निधी पंचायत विभागाने गटविकास अधिकार्‍यांच्या मंजुरीशिवाय खर्च करण्यावर र्मयादा आणल्याने दोन वर्षांत निधी खर्चाचा वांधा झाला आहे. ग्रामपंचायतींचा विकास आराखडा आणि हा उपक्रम सुरू करताना पंचवार्षिक बृहत विकास आराखडा व दरवर्षी वार्षिक कृती आराखडा या दोन प्रकारे करण्यात आला. आराखड्यात अपेक्षित उत्पन्नाचा अंदाज, त्या उत्पन्नाच्या र्मयादेत गरजा आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायतींनी कामे घेणे सुरू केली; मात्र त्या कामांनाच ब्रेक लावण्याचा प्रकार गटविकास अधिकार्‍यांनी केला. त्यामुळेच गेल्या वर्षीचा निधी खर्च केवळ १५ टक्के शासनाने २0१५-१६ साठी दिलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हय़ात केवळ १५ टक्के खर्च झाल्याची माहिती आहे. ८५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर तशीच पडून आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे धाव घेतली, तसेच जिल्हा परिषद सदस्यांनीही सभांमध्ये अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यामुळे निर्बंंध हटविण्यात आले.