शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

वाळवंटातील घाण वारकरीबाह्य घटकांमुळे !

By admin | Updated: February 28, 2015 00:47 IST

लोकमत मुलाखत; तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज देहूकर महाराजांची माहिती.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा): पंढरपूरच्या वाळवंटात फड उभारून भजन-कीर्तन केल्याने कुठल्याही प्रकारची अस्वच्छता होत नाही; कारण वाळवंटातील घाण ही वारकर्‍यांमुळे होत नसून, ती वारकरीबाह्य घटकांमूळे होते, असे स्पष्ट प्रतिपादन तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज व पंढरपूरचे फडकरी प्रा. बाळासाहेब महाराज देहूकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना केले. मेहकर येथे २७ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. न्यायालयाने वाळवंटातील अस्वच्छतेबाबत थेट वारकर्‍यांनाच सवाल केल्याने पंढरीतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पृष्ठभूमीवर देहूकर महाराज यांनी त्यांचे विचार मांडले.

प्रश्न : पंढरपूरच्या वाळवंटातील घाण कशामूळे होते?-कार्तीकी यात्रेच्यावेळी वाळवंटात होणारी सर्व घाण ही केवळ वारकर्‍यांमूळेच होते, हा गैरसमज आहे. वास्तविक वाळवंटात होणारी ८0 टक्के घाण ही वारकरीबाह्य घटकांमुळे होते. जसे वाळवंटात लागणारी हॉटेल्स व दुकानांचे तंबू, फेरीवाले, फेरीवाल्यांनी तात्पुरत्या मुक्कामासाठी ठोकलेले तंबू, पार्कींगसाठी येणारी वाहने, मोकाट गुरेढोरे आदी घटकांमूळे वाळवंटात घाण पसरते.

प्रश्न : फडांमध्ये कचरा निर्माण होत नाही का?-महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील वारकरी वाळवंटातील फडांमध्ये हजेरी लावतात. त्यामुळे निश्‍चितच कचरा निर्माण होऊ शकतो. या फडांमधून होणार्‍या पंगतीच्या पत्रावळींचा व शिल्लक राहीलेल्या अन्नाचा कचरा ही बाब मान्य आहे. परंतु इतर घटकांपेक्षा फडांमध्ये केवळ २0 टक्के कचरा निर्माण होतो.

प्रश्न : पंढरीच्या वाळवंटातील अस्वच्छतेला आळा कसा बसेल?-फडांमधून होणारा कचरा दूर करण्यासाठी प्रत्येक फडापुढे एक कचराकुंडी ठेऊन त्यातील कचरा दररोज गावाबाहेर हलविला गेल्यास अस्वच्छतेला आळा बसू शकतो. त्याचबरोबर वाळवंटात फिरती शौचालये तयार करून, गावांमध्ये चौकाचौकात शौचालये उभारून वारकर्‍यांच्या शौचविधीची सोय करता येऊ शकते.

प्रश्न : सध्याच्या फिरत्या शौचालयांची काय स्थिती आहे?-कार्तीकी यात्रेला फिरती शौचालये असतात, परंतु त्यात पाण्याची उपलब्धता नसते. त्यातील घाणेची दररोज विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे फिरत्या शौचालयातून दुर्गंधी सुटल्याने वारकरी या शौचालयात जाणे टाळतात. शेवटी याला प्रशासनच कारणीभूत आहे.

प्रश्न : वारकर्‍यांची बाजू समजून घेतली जाते का?-वारकर्‍यांची बाजू समजून घेण्यामध्ये व ती न्यायालयापुढे मांडण्यामध्ये शासन कमी पडत आहे. चंद्रभागेच्या तिरावरील घाण व अस्वच्छतेच्या विळख्याला कारणीभूत ठरणार्‍या अनेक घटकांना दोषी धरण्याऐवजी त्याचे खापर केवळ वारकर्‍यांवर फोडले जाते. वारकर्‍यांच्या शतकानुशतकांच्या परंपरांना बाधा निर्माण करणे म्हणजे ह्यजखम पायाला व पट्टी कपाळालाह्ण असा प्रकार झाला आहे.

प्रश्न : फडाची परंपरा केंव्हापासून आहे?-महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पंढरपूर वारीची पंरपरा ही शेकडो वर्षे जुनी आहे. फडकर्‍यांची वाळवंटात फड उभारून कीर्तन-भजन करण्याची परंपरा ७५0 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वारकर्‍यांची बाजु समजून घेण्याची गरज आहे.