शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वाळवंटातील घाण वारकरीबाह्य घटकांमुळे !

By admin | Updated: February 28, 2015 00:47 IST

लोकमत मुलाखत; तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज देहूकर महाराजांची माहिती.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा): पंढरपूरच्या वाळवंटात फड उभारून भजन-कीर्तन केल्याने कुठल्याही प्रकारची अस्वच्छता होत नाही; कारण वाळवंटातील घाण ही वारकर्‍यांमुळे होत नसून, ती वारकरीबाह्य घटकांमूळे होते, असे स्पष्ट प्रतिपादन तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज व पंढरपूरचे फडकरी प्रा. बाळासाहेब महाराज देहूकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना केले. मेहकर येथे २७ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. न्यायालयाने वाळवंटातील अस्वच्छतेबाबत थेट वारकर्‍यांनाच सवाल केल्याने पंढरीतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पृष्ठभूमीवर देहूकर महाराज यांनी त्यांचे विचार मांडले.

प्रश्न : पंढरपूरच्या वाळवंटातील घाण कशामूळे होते?-कार्तीकी यात्रेच्यावेळी वाळवंटात होणारी सर्व घाण ही केवळ वारकर्‍यांमूळेच होते, हा गैरसमज आहे. वास्तविक वाळवंटात होणारी ८0 टक्के घाण ही वारकरीबाह्य घटकांमुळे होते. जसे वाळवंटात लागणारी हॉटेल्स व दुकानांचे तंबू, फेरीवाले, फेरीवाल्यांनी तात्पुरत्या मुक्कामासाठी ठोकलेले तंबू, पार्कींगसाठी येणारी वाहने, मोकाट गुरेढोरे आदी घटकांमूळे वाळवंटात घाण पसरते.

प्रश्न : फडांमध्ये कचरा निर्माण होत नाही का?-महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील वारकरी वाळवंटातील फडांमध्ये हजेरी लावतात. त्यामुळे निश्‍चितच कचरा निर्माण होऊ शकतो. या फडांमधून होणार्‍या पंगतीच्या पत्रावळींचा व शिल्लक राहीलेल्या अन्नाचा कचरा ही बाब मान्य आहे. परंतु इतर घटकांपेक्षा फडांमध्ये केवळ २0 टक्के कचरा निर्माण होतो.

प्रश्न : पंढरीच्या वाळवंटातील अस्वच्छतेला आळा कसा बसेल?-फडांमधून होणारा कचरा दूर करण्यासाठी प्रत्येक फडापुढे एक कचराकुंडी ठेऊन त्यातील कचरा दररोज गावाबाहेर हलविला गेल्यास अस्वच्छतेला आळा बसू शकतो. त्याचबरोबर वाळवंटात फिरती शौचालये तयार करून, गावांमध्ये चौकाचौकात शौचालये उभारून वारकर्‍यांच्या शौचविधीची सोय करता येऊ शकते.

प्रश्न : सध्याच्या फिरत्या शौचालयांची काय स्थिती आहे?-कार्तीकी यात्रेला फिरती शौचालये असतात, परंतु त्यात पाण्याची उपलब्धता नसते. त्यातील घाणेची दररोज विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे फिरत्या शौचालयातून दुर्गंधी सुटल्याने वारकरी या शौचालयात जाणे टाळतात. शेवटी याला प्रशासनच कारणीभूत आहे.

प्रश्न : वारकर्‍यांची बाजू समजून घेतली जाते का?-वारकर्‍यांची बाजू समजून घेण्यामध्ये व ती न्यायालयापुढे मांडण्यामध्ये शासन कमी पडत आहे. चंद्रभागेच्या तिरावरील घाण व अस्वच्छतेच्या विळख्याला कारणीभूत ठरणार्‍या अनेक घटकांना दोषी धरण्याऐवजी त्याचे खापर केवळ वारकर्‍यांवर फोडले जाते. वारकर्‍यांच्या शतकानुशतकांच्या परंपरांना बाधा निर्माण करणे म्हणजे ह्यजखम पायाला व पट्टी कपाळालाह्ण असा प्रकार झाला आहे.

प्रश्न : फडाची परंपरा केंव्हापासून आहे?-महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पंढरपूर वारीची पंरपरा ही शेकडो वर्षे जुनी आहे. फडकर्‍यांची वाळवंटात फड उभारून कीर्तन-भजन करण्याची परंपरा ७५0 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वारकर्‍यांची बाजु समजून घेण्याची गरज आहे.