शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

वाळवंटातील घाण वारकरीबाह्य घटकांमुळे !

By admin | Updated: February 28, 2015 00:47 IST

लोकमत मुलाखत; तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज देहूकर महाराजांची माहिती.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा): पंढरपूरच्या वाळवंटात फड उभारून भजन-कीर्तन केल्याने कुठल्याही प्रकारची अस्वच्छता होत नाही; कारण वाळवंटातील घाण ही वारकर्‍यांमुळे होत नसून, ती वारकरीबाह्य घटकांमूळे होते, असे स्पष्ट प्रतिपादन तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज व पंढरपूरचे फडकरी प्रा. बाळासाहेब महाराज देहूकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना केले. मेहकर येथे २७ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. न्यायालयाने वाळवंटातील अस्वच्छतेबाबत थेट वारकर्‍यांनाच सवाल केल्याने पंढरीतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पृष्ठभूमीवर देहूकर महाराज यांनी त्यांचे विचार मांडले.

प्रश्न : पंढरपूरच्या वाळवंटातील घाण कशामूळे होते?-कार्तीकी यात्रेच्यावेळी वाळवंटात होणारी सर्व घाण ही केवळ वारकर्‍यांमूळेच होते, हा गैरसमज आहे. वास्तविक वाळवंटात होणारी ८0 टक्के घाण ही वारकरीबाह्य घटकांमुळे होते. जसे वाळवंटात लागणारी हॉटेल्स व दुकानांचे तंबू, फेरीवाले, फेरीवाल्यांनी तात्पुरत्या मुक्कामासाठी ठोकलेले तंबू, पार्कींगसाठी येणारी वाहने, मोकाट गुरेढोरे आदी घटकांमूळे वाळवंटात घाण पसरते.

प्रश्न : फडांमध्ये कचरा निर्माण होत नाही का?-महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील वारकरी वाळवंटातील फडांमध्ये हजेरी लावतात. त्यामुळे निश्‍चितच कचरा निर्माण होऊ शकतो. या फडांमधून होणार्‍या पंगतीच्या पत्रावळींचा व शिल्लक राहीलेल्या अन्नाचा कचरा ही बाब मान्य आहे. परंतु इतर घटकांपेक्षा फडांमध्ये केवळ २0 टक्के कचरा निर्माण होतो.

प्रश्न : पंढरीच्या वाळवंटातील अस्वच्छतेला आळा कसा बसेल?-फडांमधून होणारा कचरा दूर करण्यासाठी प्रत्येक फडापुढे एक कचराकुंडी ठेऊन त्यातील कचरा दररोज गावाबाहेर हलविला गेल्यास अस्वच्छतेला आळा बसू शकतो. त्याचबरोबर वाळवंटात फिरती शौचालये तयार करून, गावांमध्ये चौकाचौकात शौचालये उभारून वारकर्‍यांच्या शौचविधीची सोय करता येऊ शकते.

प्रश्न : सध्याच्या फिरत्या शौचालयांची काय स्थिती आहे?-कार्तीकी यात्रेला फिरती शौचालये असतात, परंतु त्यात पाण्याची उपलब्धता नसते. त्यातील घाणेची दररोज विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे फिरत्या शौचालयातून दुर्गंधी सुटल्याने वारकरी या शौचालयात जाणे टाळतात. शेवटी याला प्रशासनच कारणीभूत आहे.

प्रश्न : वारकर्‍यांची बाजू समजून घेतली जाते का?-वारकर्‍यांची बाजू समजून घेण्यामध्ये व ती न्यायालयापुढे मांडण्यामध्ये शासन कमी पडत आहे. चंद्रभागेच्या तिरावरील घाण व अस्वच्छतेच्या विळख्याला कारणीभूत ठरणार्‍या अनेक घटकांना दोषी धरण्याऐवजी त्याचे खापर केवळ वारकर्‍यांवर फोडले जाते. वारकर्‍यांच्या शतकानुशतकांच्या परंपरांना बाधा निर्माण करणे म्हणजे ह्यजखम पायाला व पट्टी कपाळालाह्ण असा प्रकार झाला आहे.

प्रश्न : फडाची परंपरा केंव्हापासून आहे?-महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पंढरपूर वारीची पंरपरा ही शेकडो वर्षे जुनी आहे. फडकर्‍यांची वाळवंटात फड उभारून कीर्तन-भजन करण्याची परंपरा ७५0 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वारकर्‍यांची बाजु समजून घेण्याची गरज आहे.