शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

महिनाभरापासून मिळाले नाही तुरीचे चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:25 IST

बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : आधरभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून जात असला तरी; ४ मार्चपर्यंत राज्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. विकलेल्या तुरीचे चुकारे थकल्याने, तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, हमी दराने विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडमार्फत अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत हमी दराने तूर खरेदी सुरू करण्यात आली. नाफेड सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर प्रती क्विंटल ४ हजार ८२८ रुपये हमी दराने तूर खरेदी करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर ७ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. खरेदीच्या मुहूर्तापासून ४ मार्चपर्यंत हमी दराने तूर विकलेल्या शेतकºयांना ‘नाफेड’मार्फत तुरीचे चुकारे अद्याप देण्यात आले नाही. अशीच परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यात आहे. खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी होत असताना, विकलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नाफेडमार्फत तूर खरेदीत विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात मिळणाºया कमी दरात तूर विकण्याची वेळ तूर उत्पादक शेतकºयांवर आली आहे.हक्काचे पैसे मिळणार केव्हा?नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर हमी दराने तूर विकल्यानंतर महिनाभराचा कालावधी होत असला तरी, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे अद्याप शेतकºयांना मिळाले नाही. त्यामुळे शेतीच्या कामांसह कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळणार तरी केव्हा, याबाबत शेतकºयांकडून प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी