शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित ठेवले; ICICI लोम्बार्ड कंपनीला काळया यादीत टाकणार

By संतोष येलकर | Updated: May 15, 2023 16:44 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहती, जिल्हा प्रशासनाने केली शासनाकडे शिफारस

अकोला: जिल्ह्यात पीक विमा काढण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड या विमा कंपनीने कामात दिरंगाई करुन, जिल्हयातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित ठेवले. त्यामुळे या प्रकरणी आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोमवार, १५ मे रोजी दिली.

पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसान भरपाइपोटी पीक विमा भरपाईचा मोबदला देण्यासाठी करावयाची प्राथमिक चौकशी, झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांचे पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी शासनामार्फत आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, जिल्हयात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना प्रतिसाद न देणे, त्यानुषंगाने कामात दिरंगाई करणे, मनुष्यबळाची उपलब्धता नसणे, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणे अशा कारणांमुळे आयसीआयसीआय लोम्बार्ड या विमा कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी शिफारस जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी १५ मे रोजी दिली.

शेतकऱ्यांचे प्रलंबित वीमा दावे ५ जूनपर्यंत स्वीकारणार !

जिल्हयात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे विमा दावे अद्याप प्रलंबित असल्यास संबंधित दावे ५ जूनपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांनी पीक विमा दावे येत्या ५ जून पर्यंत सादर करावे,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला