शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

डेंग्यू, हिवतापसदृश तापाने अकोलेकर त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:13 IST

गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचले असून, डासांची उत्पत्ती वाढली आहे.

अकोला : जिल्ह्यात डेंग्यू, हिवतापसदृश तापाने नागरिक त्रस्त झाले असून, सर्दी, खोकला अन् डोकेदुखीच्या समस्येनेही अनेकांची झोप उडविली आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली असून, नागरिकांनी बचावात्मक उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचले असून, डासांची उत्पत्ती वाढली आहे. शिवाय, जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दूषित पाणी पिण्यात आले. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील नागरिकांवर झाला असून, डेंग्यू, हिवतापसदृश तापाने अनेकांना ग्रासले आहे. यामध्ये बहुतांश रुग्णांना सर्दी, खोकला आणि डोकेदुखीच्याही समस्या सतावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी साथीच्या आजारांना कारणीभूत डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावी, तसेच घरात व परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.दवाखाने हाउसफुल्लसाथीच्या आजारामुळे नागरिक त्रस्त असून, जिल्ह्यातील लहान-मोठे दवाखाने हाउसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढल्याचेही दिसून येत आहे.शासकीय रुग्णालये देताहेत आजारांना निमंत्रणसर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अस्वच्छता असल्याचे दिसून येते. हा प्रकार रुग्णांसाठी घातक असून, विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे.परिसर स्वच्छ ठेवा!नागरिकांनी स्वत:च्या घरासोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. शिवाय, डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी साठविण्याची भांडी कोरडी ठेवून ती कोरड्या फडक्याने पुसून घ्यावी, जेणेकरून भांड्याच्या कडांना चिटकलेली डासांची अंडी नष्ट होतील.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य