शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

डेंग्यू, हिवतापसदृश तापाने अकोलेकर त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:13 IST

गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचले असून, डासांची उत्पत्ती वाढली आहे.

अकोला : जिल्ह्यात डेंग्यू, हिवतापसदृश तापाने नागरिक त्रस्त झाले असून, सर्दी, खोकला अन् डोकेदुखीच्या समस्येनेही अनेकांची झोप उडविली आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली असून, नागरिकांनी बचावात्मक उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचले असून, डासांची उत्पत्ती वाढली आहे. शिवाय, जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दूषित पाणी पिण्यात आले. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील नागरिकांवर झाला असून, डेंग्यू, हिवतापसदृश तापाने अनेकांना ग्रासले आहे. यामध्ये बहुतांश रुग्णांना सर्दी, खोकला आणि डोकेदुखीच्याही समस्या सतावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी साथीच्या आजारांना कारणीभूत डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावी, तसेच घरात व परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.दवाखाने हाउसफुल्लसाथीच्या आजारामुळे नागरिक त्रस्त असून, जिल्ह्यातील लहान-मोठे दवाखाने हाउसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढल्याचेही दिसून येत आहे.शासकीय रुग्णालये देताहेत आजारांना निमंत्रणसर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अस्वच्छता असल्याचे दिसून येते. हा प्रकार रुग्णांसाठी घातक असून, विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे.परिसर स्वच्छ ठेवा!नागरिकांनी स्वत:च्या घरासोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. शिवाय, डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी साठविण्याची भांडी कोरडी ठेवून ती कोरड्या फडक्याने पुसून घ्यावी, जेणेकरून भांड्याच्या कडांना चिटकलेली डासांची अंडी नष्ट होतील.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य