शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे सोपविण्याची मागणी

By admin | Updated: June 3, 2014 20:53 IST

मूर्तिजापूर नगर पालिकेने पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी होत आहे.

मूर्तिजापूर : शहरवासीयांचा जीव पाण्यासाठी कासाविस झाला असून, नगर पालिकेने आपल्या अखत्यारितील पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव गावंडे यांनी केली आहे.मूर्तिजापुरातील नागरिकांना गत अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नळांना दर पंधरा दिवसांनंतर पाणी येते. हे पाणी पिण्यास योग्य असेलच याची खात्री देता येत नाही. गत चार-पाच वर्षांपूर्वर्ी मूर्तिजापूरचा पाणीपुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होता. त्यानंतर पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगर पालिकेने स्वत:कडे घेतली. तालुक्यात आधीच पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यात नगर पालिकेकडे कुशल कर्मचार्‍यांची वानवा आहे. त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचे संकट अधिकच गडद झाले. मूर्तिजापूरच्या पाणी समस्येविषयी समाजसेवक कृष्णराव गावंडे यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याशी चर्चा केली असता, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कुशल कर्मचार्‍यांची गरज आहे आणि कुशल कर्मचारी मजीप्राकडे आहेत. मूर्तिजापूर नगर पालिकेने पाणीपुरवठा योजनेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव पाठविलेला नसल्यामुळे पाणीपुरवठ्याची जबाबदारी मजीप्राकडे देण्यात आली नाही, असे ते म्हणाले.