शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन, विविध प्रश्न निकाली काढण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 20:25 IST

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम वगळता पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांनी सोमवार ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन गुरुवार १४ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही सुरू होते.

वाशिम, दि. 14  - विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम वगळता पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांनी सोमवार ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन गुरुवार १४ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही सुरू होते. या दिवशी अंगणवाडी सेविकांनी वाशिम जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करीत विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचा-यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा समावेश आहे. अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपामुळे अंगणवाडी केंद्रांतील बालकांना पोषण आहार वितरण बंद आहे. दिल्ली, केवळ, बेंगलोर, तामिळनाडू, पांडेचेरी राज्यांनी अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधन, वेतनात ब-यापैकी वाढ केली. महाराष्ट्र सरकारनेही सेविका, मदतनिसांच्या वेतनवाढीचा निर्णय घ्यावा, सेवानिवृत्तीनंतर लाभाची रक्कम २ लाख करावी, टी.एच.आर. बंद करावा, मिनी अंगणवाडी केंद्रे पुर्ण केंद्रात रुपांतरीत करावे, अंगणवाड्यांची स्टेशनरी, रजिस्टर, अहवाल व इतर साहित्य सरकारने पुरवावी, दरमहा १ तारखेपर्यत मानधन द्यावे, अंगणवाड्याचे खाजगीकरण करु नये, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात थाळीनाद आंदोलन करून त्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले