शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे प्रस्ताव सादर करण्यात दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:22 IST

अकोला व बाळापूर या दोनच तालुक्यांतील मदतनिधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व तेल्हारा या तीन तालुक्यांतील मदतनिधी मागणीचे प्रस्ताव २२ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले नाही.

- संतोष येलकरअकोला : दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव १९ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी गत आठवड्यात जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाºयांसह पाचही तहसीलदारांना दिला; मात्र अकोला व बाळापूर या दोनच तालुक्यांतील मदतनिधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व तेल्हारा या तीन तालुक्यांतील मदतनिधी मागणीचे प्रस्ताव २२ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्याच्या कामात संबंधित तहसील कार्यालयांकडून दिरंगाई होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या मदतनिधी मागणीचे प्रस्ताव १९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसीलदारांना गत १६ नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानुसार २० नोव्हेंबरपर्यंत पाच तालुक्यांपैकी अकोला व बाळापूर या दोनच तालुक्यांतील मदतनिधी मागणीचे प्रस्ताव तहसीलदारांकडून सादर करण्यात आले असले, तरी बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील मदतनिधीचे प्रस्ताव संबंधित तहसीलदारांकडून २२ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधीचे प्रस्ताव सादर करण्याच्या कामात संबंधित तहसील कार्यालयांकडून दिरंगाई होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.निधी मागणीच्या प्रस्तावात अशी मागविण्यात आली माहिती!दुष्काळी परिस्थितीत पीकनिहाय नुकसानाचे क्षेत्र, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि राष्ट्रीय आपत्ती मदतनिधी (एनडीआरएफ) निकषानुसार दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी आवश्यक असलेला निधी इत्यादी प्रकारची माहिती मदतनिधी मागणीच्या प्रस्तावात तहसीलदारांकडून मागविण्यात आली आहे.मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास होत आहे विलंब!दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांमधील मदतनिधीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पाचही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे; मात्र दुष्काळग्रस्त तीन तालुक्यांतील मदतनिधीचे प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले नसल्याने, पाचही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या प्रक्रियेलाही विलंब होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ