शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राजराजेश्वराला भक्तांचा जलाभिषेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:29 AM

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा असून, या वर्षी शिवभक्तांनी राजराजेश्वराला, तर भक्तांना वरुणराजाने जलाभिषेक ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा असून, या वर्षी शिवभक्तांनी राजराजेश्वराला, तर भक्तांना वरुणराजाने जलाभिषेक करून, हा आनंदसोहळा द्विगुणित केला.यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली व वातावरणात आनंद भरला. सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. गांधीग्राम येथून पूर्णेच्या पात्रातून जल आणून, त्याचा अभिषेक राजराजेश्वराला केला. यावेळी पावसानेही हजेरी लावत शिवभक्तांवर अभिषेक केल्याचे दृष्य होते. यंदाच्या पालखीमध्ये जुने शहरातून सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची होती, यंदा ७७१ भरण्यांची कावड काढली. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १११ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरली. कावडसोबतच शिभक्तांनी पालखीवर कल्पक आणि आकर्षक देखावे उभारले होते.विविध शिवभक्त मंडळांनी साकारलेले पालखीवरील आकर्षक देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. महादेवाच्या विविध छटा शिवभक्त मंडळांनी साकारल्या होत्या. कावडयात्रा उत्सव हा अकोलेकरांसाठी एक पर्वणीच ठरली. या सोहळ्यानिमित्त व्यापारी, दुकानदार यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करून उत्सवात सहभाग घेतला. नागरिकांनीही हा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गांधीग्राम ते अकोला १७ किमीचे अंतर पायी कापल्यानंतरही पालखीतील शिवभक्तांचा उत्साह जराही कमी झाला नाही.शिवभक्तानी राजेश्वराला पाच प्रदक्षिणा घालून शिवभक्तांनी भक्तिभावाने जलाभिषेक केला. चिमुकल्या बालक, युवक, आबालवृद्ध सर्वच कावडयात्रेचे खांदेकरी होऊन उत्साहात सहभागी झाले. पालखी मार्गावरील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांच्यावतीने शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.