शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भूसंपादन मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 10:52 IST

शासनाकडून न्याय मिळावा, अशी अपेक्षा या कुटुंबाने व्यक्ती केली आहे.

ठळक मुद्दे हृदयविकाराच्या झटक्याने ११ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मोबदला म्हणून अवघे ५ लाख ३० हजार रुपये देण्यात आले होते.

- विजय शिंदे

अकोट (जि. अकोला) : अकोट तालुक्यातील शहापूर धरणात जमीन गेल्याने भूमिहीन झालेल्या शेतक-याने भूसंपादनाचा संपूर्ण मोबदला मिळावा याकरिता संघर्ष केला. या संघर्षात ढासळलेली आर्थिक परिस्थिती व जमिनीचा माेबदला मिळत नसल्याच्या तणावात शिवपूर येथील रामदास राऊत या प्रकल्पग्रस्त शेतक-याचा अखेर हृदयविकाराच्या झटक्याने ११ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. या घटनेची हृदयद्रावक स्थिती मृत शेतकरऱ्यांच्या मुलांनी ‘लोकमत’ कार्यालयात कथन केली. त्यांच्या मृत्यूनंतर तरी शासनाकडून न्याय मिळावा, अशी अपेक्षा या कुटुंबाने व्यक्ती केली आहे.

अकोला जिह्यातील अकोट तालुक्यात शिवपूर कासोद येथे शहापूर लघुपाटबंधारे विभागाच्या धरण प्रकल्पाकरिता रामदास राऊत, त्यांची पत्नी बेबीताई व वडील बबन राऊत यांचे नावे असलेली शेत सर्व्हे गट क्रमांक २३५,२३८ व २२७ मधील १० एकर ३० गुंठे जमीन संपादित करण्यात आली. या भूसंपादनाचा निवाडा भूसंपादन अधिनियम, १८९४ चे कलम १२ नुसार करण्यात आला. या निवाड्याचा आदेश २० ऑगस्ट २००८ रोजी पारित करण्यात आल्यानंतर राऊत कुटुंबाची १० एकर ३० गुंठे सर्व शेती ताब्यात घेत मोबदला म्हणून अवघे ५ लाख ३० हजार रुपये देण्यात आले होते. विशेष म्हणजे या मोबदल्याच्या रकमेमधून जिल्हा मध्यवर्ती बँकेने ६० हजार रुपये पीक कर्जाची कपात करून शेतक-याच्या हाती ४ लाख ७० हजार ठेवले. मोबदल्याची रक्कमसुध्दा दोन टप्प्यात देण्यात आली. अल्प मोबदला मिळत असल्याने तसेच दिलेल्या मोबदल्याच्या रकमेत एक एकर शेतीसुध्दा विकत मिळत नसल्याने या भूमिहीन शेतक-याने संबंधित भूसंपादन अधिकारी, शहापूर लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता, त्यांना कायदा दुरुस्ती करणे सुुरू आहे त्यामुळे अधिक मोबदला मिळणार, भूमिहीन होत असल्याने ई-क्लासची जमीन तसेच शासकीय सेवेत कुंटुबांतील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन त्यावेळी देऊन बोळवण केली होती.

परंतु १२ वर्षांचे कालावधीत केवळ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आले. भूसंपादन संबंधित नोटीस बोर्डवर जाहीरनामा लावल्याचे दाखवित शेतकी सूचना पत्रावर सह्या घेऊन २०-८० टक्के असा दोन टप्प्यात मोबदला घेतल्यानंतरही आक्षेप नोंदविता येत असल्याची हमी देत नोकरी व भूमिहीन झालेल्यांना ई-क्लास जमिनी देण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे रामदास राऊत यांनी अल्प मोबदल्याबाबत आक्षेप नोंदवित शासनाविरुध्द याचिकासुध्दा दाखल केली आहे; परंतु अद्यापही न्याय मिळाला नाही. अशा स्थितीत मानसिक तणावामुळे रामदास राऊत यांचे हृदयविकाराने निधन झाले.

पीएमओकडून दखल...

जमिनीचा मिळालेला अल्प मोबदला, शासकीय नोकरी नाही. त्यामुळे रामदास राऊत यांनी थेट प्रधानमंत्री कार्यालयात नरेंद्र मोदी यांना आपली व्यथा कळविली होती. प्रधानमंत्री कार्यालयाने राऊत यांच्या पत्राची दखल घेत तत्काळ कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना २१ डिसेंबर २०१७ रोजी कळविले होते; परंतु न्याय मिळाला नाही.

 

आमचे वडील शेतमालकाचे भूमिहीन शेतमजूर झाले. दहा एकराच्या भूसंपादनापोटी मिळालेल्या अल्प मोबदल्यात अर्धीही शेती घेता आली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायाकरिता संघर्षमय लढा सुरू ठेवला होता. ते सतत तणावात होते. मानसिक ताणतणावाने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला. अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतीच्या हक्काच्या मोबदल्याकरिता आपल्या वडिलांचा लढा आपण सुरूच ठेवणार आहे

- शिवकुमार रामदास राऊत, शिवपूर

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटFarmerशेतकरी