शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दिव्याखाली आयुष्याचा अंधार

By admin | Updated: December 15, 2014 00:11 IST

विद्युत अपघातात वाढ: अकोला जिल्ह्यात तीन वर्षात ६५ विद्युत बळी

मुकुंद माळवे/अकोला आयुष्याची पहाट, खेळण्याचे अल्लड वय; पण परिस्थिती गरिबीची होती. पोटाची खळगी भरण्यासाठी हाताशी येईल ते काम करण्याची तयारी होती. त्यामुळे घरच्या जनावरांसाठी चारा गोळा करण्यास गेलेला भौरद गावातील जेमतेम १३ वर्षाचा रवी तेलंग दुपार झाली तरी घरी परतलाच नाही! दुपार झाल्यानंतरही न आल्यामुळे शोधाशोध केली असता तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन जागीच गतप्राण झाला. या घटनेला दीड वर्षे झाली. तेलंग कुटुंबासाठी तर जीवितहानी कधीही न भरणारी; मात्र महावितरणकडून अद्याप विद्युत अधिनियमाप्रमाणे पूर्ण मदत दिलीच नाही. हे एक नाही अशी अनेक प्रकरणे आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अमरावती परिमंडळातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात २0११-२0१४ दरम्यान तब्बल १३९ जण मृत्युमुखी पडले आहेत. यातून महावितरण कंपनीचे विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसह, विद्युत सुरक्षा नियमांचे उघड-उघड उल्लंघन होत असल्याचा प्रकार माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीतून पुढे आला आहे. जिवंत वीज वाहिनीशी अथवा विद्युत प्रवाहाशी संपर्क आल्यास विद्युत अपघात होतात. या अपघातात प्राणहानीदेखील होत असते. पावसाळय़ात विद्युत वाहिनी तुटून वीज अपघात होण्याचे प्रकार ग्रामीण भागात होतात. महाराष्ट्र विद्युत निरीक्षण महामंडळाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २0१0-११ ते २0१२-१३ दरम्यान एकूण ६६४८ प्राणघातक विद्युत अपघात प्रकरणांची नोंद झाली आहे. या अपघातात बळी गेलेल्यांमध्ये मानवी व पशू या दोन्हींचा सामावेश आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधून सर्वात गंभीर परिस्थिती अकोला जिल्ह्याची असून, जिल्ह्यात २0११-१४ या तीन वर्षाच्या कालखंडात एकू ण १८६ विद्युत अपघात झालेत. यात ६५ व्यक्ती मुत्युमुखी पडले असून, त्यामध्ये चार विद्युत क र्मचार्‍यांचा समावेश आहे. यापैकी केवळ १0 प्रकरणांमध्येच महावितरणकडून मदत देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि अचलपूर उपविभागात २0११-१३ दरम्यान झालेल्या विद्युत अपघातामध्ये ५६ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून, त्यात तीन विद्युत कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये याच कालावधीमध्ये ६१ जण मृत्युमुखी पडले असून २0 जण जखमी झाले होते. शेतकरी आजही पशुधनावर विसंबून आहे. विद्युत अपघातामध्ये पशू मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडतात. अकोला जिल्ह्यात उपरोक्त तीन वर्षाच्या कालावधीत ७0 जनावरे तर यवतमाळ जिल्ह्यात त्याच कालावधीत १५६ जनावरे मृत्युमुखी पडली. पशुधनाअभावी शेतकरी असाह्य होत असतो; मात्र महावितरण कंपनीद्वारे दिली जाणारी मदत अत्यंत तुटपुंजी असते. आपद्ग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे विद्युत अधिनियमात स्पष्ट निर्देश असतानाही वर्षांनुवर्षे अपघातग्रस्त कुटुंबे मदतीपासून वंचित राहतात, हे जळजळीत सत्य समोर आले असून, हा प्रकार म्हणजे महावितरणच्या दिव्याखाली अंधार अशा उक्तीत मोडणारा आहे.       बहुतेक विद्युत अपघातासाठी महावितरण कंपनी पूर्णत: जबाबदार आहे. विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष, अकार्यक्षम संरक्षण योजना आणि सुरक्षा नियमांची होत असलेली पायमल्ली, यामुळे अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विद्युत निरीक्षण मंडळ अपघाताची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी अभिप्राय देते; मात्र प्रत्यक्ष नुकसान भरपाई अथवा मदत महावितरण कंपनीने द्यावयाची असल्याचे प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ, अमरावती अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे यांनी स्पष्ट केले.