शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

राज्यातील कापूस उत्पादकांसाठी अमावास्येची रात्र चिंतेची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 10:23 IST

Agriculture News : शनिवार, ७ ऑगस्ट रोजी अमावास्या आहे. या अमावास्येच्या रात्री बोंडअळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

- सागर कुटे

अकोला : राज्यातील काही भागात कपाशी पीक पात्यावर आले आहे. शनिवार, ७ ऑगस्ट रोजी अमावास्या आहे. या अमावास्येच्या रात्री बोंडअळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना ही रात्र चिंतित करणारी ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. राज्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोंडअळी ही मारक ठरत आहे. गतवर्षी या गुलाबी बोंडअळीमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कापसाचे उत्पादन निम्म्यावर आले. २०१७-१८ मध्येही हीच परिस्थिती पाहावयास मिळाली होती. राज्यातील कृषी विद्यापीठ व कृषी विभागाकडून यावर वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहे. तरीही बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येत आहे. यंदाही काही जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. शनिवारचा दिवस हा आणखी धोका वाढविणारा ठरू शकतो.

 

अमावास्येच्या रात्री कपाशीवर हा परिणाम

अमावस्येच्या रात्रीच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर गुलाबी बोंडअळीचे पतंग कपाशीवर मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. त्याचा परिणाम ५-६ दिवसांनी कापूस पिकावर दिसून येतो. यावेळी फुलाची डोमकळी म्हणजे (न उमललेली कळी) दिसू लागत असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने स्पष्ट केले.

 

ही अंधश्रद्धा नव्हे!

अमावास्येला कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. ही निव्वळ अंधश्रद्धा नसून पतंगांनी घातलेल्या अंड्यांमधून घनदाट अंधारात बोंडअळीच्या अळ्या बाहेर पडत असल्याचे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. शनिवारी सायंकाळपासून अमावास्या सुरू होत असल्याने पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

कपाशीवर फवारणी करा!

बोंडअळी अंडी घालण्याआधी तीन दिवसांपर्यंत पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन ०.१५ टक्के प्रवाही (एनएसकेई बेस) २५ मि.ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असल्याने बिव्हेरिया बॅसियाना ४० मि. ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

शेतात फेरोमन सापळे पाच प्रती एकर लावावेत व त्यावरील सूचनेनुसार विशिष्ट कालावधीत कामगंध वड्या (ल्यूर) बदलणे आवश्यक आहे. दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावे. जर सापळ्यामध्ये प्रत्येकी आठ ते दहा नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या वापराद्वारे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

 

- डॉ. उपेंद्र कुलकर्णी, कीटकशास्त्रज्ञ, कीटकशास्त्र विभाग डॉ. पंदेकृवि, अकोला

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला