शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कापूस उत्पादकांसाठी अमावास्येची रात्र चिंतेची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 10:23 IST

Agriculture News : शनिवार, ७ ऑगस्ट रोजी अमावास्या आहे. या अमावास्येच्या रात्री बोंडअळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

- सागर कुटे

अकोला : राज्यातील काही भागात कपाशी पीक पात्यावर आले आहे. शनिवार, ७ ऑगस्ट रोजी अमावास्या आहे. या अमावास्येच्या रात्री बोंडअळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना ही रात्र चिंतित करणारी ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. राज्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोंडअळी ही मारक ठरत आहे. गतवर्षी या गुलाबी बोंडअळीमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कापसाचे उत्पादन निम्म्यावर आले. २०१७-१८ मध्येही हीच परिस्थिती पाहावयास मिळाली होती. राज्यातील कृषी विद्यापीठ व कृषी विभागाकडून यावर वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहे. तरीही बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येत आहे. यंदाही काही जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. शनिवारचा दिवस हा आणखी धोका वाढविणारा ठरू शकतो.

 

अमावास्येच्या रात्री कपाशीवर हा परिणाम

अमावस्येच्या रात्रीच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर गुलाबी बोंडअळीचे पतंग कपाशीवर मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. त्याचा परिणाम ५-६ दिवसांनी कापूस पिकावर दिसून येतो. यावेळी फुलाची डोमकळी म्हणजे (न उमललेली कळी) दिसू लागत असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने स्पष्ट केले.

 

ही अंधश्रद्धा नव्हे!

अमावास्येला कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. ही निव्वळ अंधश्रद्धा नसून पतंगांनी घातलेल्या अंड्यांमधून घनदाट अंधारात बोंडअळीच्या अळ्या बाहेर पडत असल्याचे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. शनिवारी सायंकाळपासून अमावास्या सुरू होत असल्याने पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

कपाशीवर फवारणी करा!

बोंडअळी अंडी घालण्याआधी तीन दिवसांपर्यंत पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन ०.१५ टक्के प्रवाही (एनएसकेई बेस) २५ मि.ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असल्याने बिव्हेरिया बॅसियाना ४० मि. ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

शेतात फेरोमन सापळे पाच प्रती एकर लावावेत व त्यावरील सूचनेनुसार विशिष्ट कालावधीत कामगंध वड्या (ल्यूर) बदलणे आवश्यक आहे. दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावे. जर सापळ्यामध्ये प्रत्येकी आठ ते दहा नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या वापराद्वारे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

 

- डॉ. उपेंद्र कुलकर्णी, कीटकशास्त्रज्ञ, कीटकशास्त्र विभाग डॉ. पंदेकृवि, अकोला

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला