शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कापूस उत्पादकांसाठी अमावास्येची रात्र चिंतेची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 10:23 IST

Agriculture News : शनिवार, ७ ऑगस्ट रोजी अमावास्या आहे. या अमावास्येच्या रात्री बोंडअळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

- सागर कुटे

अकोला : राज्यातील काही भागात कपाशी पीक पात्यावर आले आहे. शनिवार, ७ ऑगस्ट रोजी अमावास्या आहे. या अमावास्येच्या रात्री बोंडअळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना ही रात्र चिंतित करणारी ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. राज्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोंडअळी ही मारक ठरत आहे. गतवर्षी या गुलाबी बोंडअळीमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कापसाचे उत्पादन निम्म्यावर आले. २०१७-१८ मध्येही हीच परिस्थिती पाहावयास मिळाली होती. राज्यातील कृषी विद्यापीठ व कृषी विभागाकडून यावर वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहे. तरीही बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येत आहे. यंदाही काही जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. शनिवारचा दिवस हा आणखी धोका वाढविणारा ठरू शकतो.

 

अमावास्येच्या रात्री कपाशीवर हा परिणाम

अमावस्येच्या रात्रीच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर गुलाबी बोंडअळीचे पतंग कपाशीवर मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. त्याचा परिणाम ५-६ दिवसांनी कापूस पिकावर दिसून येतो. यावेळी फुलाची डोमकळी म्हणजे (न उमललेली कळी) दिसू लागत असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने स्पष्ट केले.

 

ही अंधश्रद्धा नव्हे!

अमावास्येला कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. ही निव्वळ अंधश्रद्धा नसून पतंगांनी घातलेल्या अंड्यांमधून घनदाट अंधारात बोंडअळीच्या अळ्या बाहेर पडत असल्याचे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. शनिवारी सायंकाळपासून अमावास्या सुरू होत असल्याने पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

कपाशीवर फवारणी करा!

बोंडअळी अंडी घालण्याआधी तीन दिवसांपर्यंत पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन ०.१५ टक्के प्रवाही (एनएसकेई बेस) २५ मि.ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असल्याने बिव्हेरिया बॅसियाना ४० मि. ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

शेतात फेरोमन सापळे पाच प्रती एकर लावावेत व त्यावरील सूचनेनुसार विशिष्ट कालावधीत कामगंध वड्या (ल्यूर) बदलणे आवश्यक आहे. दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावे. जर सापळ्यामध्ये प्रत्येकी आठ ते दहा नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या वापराद्वारे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

 

- डॉ. उपेंद्र कुलकर्णी, कीटकशास्त्रज्ञ, कीटकशास्त्र विभाग डॉ. पंदेकृवि, अकोला

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला