शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चमकी तापाचा राज्यातही धोका : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:09 IST

चमकी तापाचा प्रसार राज्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून, इतर राज्यातून येणाºया प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.

अकोला : उत्तर प्रदेशमध्ये चमकी या तापाने थैमान घातले असून, १२५ पेक्षा जास्त बालकांचा या तापामुळे बळी गेला आहे. बदलत्या हवामानासोबतच मध्यप्रदेशमार्गे राज्यात प्रवेश करणाºया प्रवाशांच्या माध्यमातून या तापाचा प्रसार राज्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून, इतर राज्यातून येणाºया प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.उत्तर प्रदेशात थैमान घालणारा ‘चमकी’ (कावासाकी) हा ताप प्रामुख्याने जपानमध्ये आढळणारा दुर्मिळ आजार आहे. वैद्यकीय भाषेत या तापाला एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम म्हटले जात असून, त्याला मेंदुचा तापदेखील म्हटल्या जाते. गर्मी किंवा उष्णतेच्या वातावरणात ० ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना या तापाचा सर्वाधिक धोका जाणवतो. गत महिनाभरातच उत्तर प्रदेशात या तापाचे १२५ पेक्षा जास्त बळी गेले असून, महाराष्ट्रात वसई येथे एका ८ महिन्याच्या बालकालाही या तापाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात परराज्यातून येणाºया प्रवाशांच्या माध्यमातूनदेखील हा आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परराज्यातून येणाºया विशेषत: आजारी प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे; मात्र स्थानिक आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वाढती उष्णता, लांबणीवर पडलेला पाऊस अन् वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे या तापाचीही शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत सतर्कता बाळगत ० ते १५ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.लक्षणे

  • अतिताप
  • उलट्या
  • डोकेदुखी
  • उष्णतेमुळे चिडचिडपणा
  • गोंधळ
  • मान आणि पाठ दुखणे
  • मळमळ
  • बोलण्यात आणि ऐकताना त्रास होणे
  • स्मृती कमजोर होणे
  • गंभीर स्थितीत लकवा किंवा कोमात जाण्याची शक्यता

अशी आहेत कारणे

  • डोक्यात ताप गेल्याने हा आजार होतो
  • मेंदूच्या पेशी आणि नसांना सूज आल्यास मेंदूचा ताप येतो.
  • इंसेफलाइटिस बॅक्टेरिया, फुंगी, परजीवी, रसायन, टॉक्सिनमुळे देखील हा ताप होण्याची शक्यता आहे.

मेंदूत ताप गेल्याने चमकी ताप होण्याची शक्यता असते. मुख्यत: उष्णतेमुळेदेखील हा ताप होऊ शकतो. राज्यात अद्याप हा आजार पसरला नसला, तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य