शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्त्यांवर सडलेल्या फुलांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 13:36 IST

सडक्या फुलांसह प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचºयाचे ढीग साचून असल्याचे चित्र अकोलेकरांना पाहावयास मिळाले.

अकोला: दिवाळीनिमित्त शहरात विविध फुलांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पावसाने सळो की पळो करून सोडले. सलग बरसणाºया पावसामुळे शेतकºयांना मातीमोल भावाने फुलांची विक्री करावी लागली. त्यामुळे नाइलाजाने शेतकºयांना फुले, केळीची पाने तशीच रस्त्यालगत टाकून द्यावी लागली. एरव्ही रात्री दहानंतर मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेचा गवगवा करून सोशल मीडियावर स्वत:ची पाठ थोपटून घेणारा मनपाचा स्वच्छता विभाग मुख्य रस्त्यांकडे फिरकलाच नसल्यामुळे सोमवारी शहरातील मुख्य रस्त्यांवर सडक्या फुलांसह कचºयाचा खच साचल्याचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळाले.मागील सहा दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम दिवाळी सणावर दिसून आला. शहरात दिवाळीच्या पूजनानिमित्त विविध रंगबेरंगी व आकर्षक फुलांची विक्री करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपºयातील शेतकरी दाखल झाले होते. तसेच लक्ष्मी मूर्ती, पणत्या, मडके, लाह्या, बत्तासे, झाडू, केळीची व आंब्याच्या पानांची विक्री करण्यासाठी किरकोळ व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यांवर दुकाने थाटली होती. सलग बरसणाºया पावसामुळे शेतकºयांसह किरकोळ व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात फुले सडल्याने शेतकºयांना मातीमोल भावाने फुलांची विक्री करावी लागली. तसेच यंदा बाजारात फुलांची जास्त आवक झाल्यामुळे अनेक शेतकºयांनी आणलेली फुले रस्त्यालगत तशीच टाकू न द्यावी लागली. फुलांसह विविध साहित्याचा रस्त्यालगत खच साचल्याची परिस्थिती निर्माण झाली असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी ६ वाजतापासूनच साफसफाईच्या कामाला प्रारंभ करणे अपेक्षित होते. या परिस्थितीची जाणीव असतानासुद्धा मनपाचा आरोग्य व स्वच्छता विभाग दिवसभर फिरकलाच नाही, हे विशेष.सणासुदीच्या दिवसांत स्वच्छता कागदावरमनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपच्यावतीने शहरात स्वच्छतेच्या कामाचा गवगवा केला जात असतानाच ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या गल्लीबोळांसह मुख्य बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरल्याचे चित्र आहे. साफसफाईच्या मुद्यावर स्वच्छता विभागाचा कारभार हवेत सुरू असून, मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात सत्तापक्ष सपशेल अपयशी ठरल्याचा सूर अकोलेकरांमधून उमटत आहे.

सत्तापक्षासह प्रशासन कुंभकर्णी झोपेतयंदाच्या दिवाळी सणावर पावसाचे सावट दिसून आले. रविवारी दिवाळी साजरी झाल्यानंतर सोमवारी सकाळी मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने कामाला लागणे क्रमप्राप्त होते. मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी सडक्या फुलांसह प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचºयाचे ढीग साचून असल्याचे चित्र अकोलेकरांना पाहावयास मिळाले. हा प्रकार पाहता सत्ताधारी भाजपसह प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप अकोलेकरांमधून होत आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला