शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

गत हंगामातील नुकसानाचे कृषी बाजारपेठेवर सावट

By admin | Updated: June 15, 2015 02:08 IST

ना पुनर्गठन ना कर्ज, शेतक-यांकडे पैसेच नाहीत.

विवेक चांदूरकर / अकोला: गतवर्षी दोन्ही हंगाम हातून गेले. पेरणी तर दूरच कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठीही पैसे नाहीत. अशातच बँका कर्ज पुनर्गठन करण्यात आडकाठी आणीत असल्यामुळे शेतकर्‍यांपुढे पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या पीक नुकसानाचे सरळ पडसाद यावर्षी कृषी बाजारपेठेवर पडत आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांना खरीप हंगामासाठी ३४४६७ लाख रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. यापैकी केवळ १२ टक्के ४४१९ लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकेला ८७५७८ लाख रुपयांचे लक्ष्य असून, त्यांनी ४७३२६ लाख म्हणजे ३३ टक्के कर्जाचे वाटप केले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा झाला असून, जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. शेतकर्‍यांनी पेरणीसाठी मशागत करून जमीन सज्ज केली आहे. आता केवळ मॉन्सूनची वाट आहे. १७ ते १८ जून रोजी मॉन्सून दाखल होणार असून, शेतकरी पेरणी करणार आहेत. मात्र, शेतकर्‍यांकडे पेरणी करण्यासाठी, पिकांना खत देण्यासाठी पैसेच नाहीत. दुसरीकडे बँका कर्ज पुनर्गठनास टाळाटाळ करीत आहेत. शेतकरी बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी ये-जा करीत आहेत. मात्र, बँका त्यांना पुनर्गठन करण्यास नकार देत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ १२ टक्केच कर्जवाटप केले आहे. त्यामुळे बँकांना कर्जवाटप करायचेच नाही, असे निदर्शनास येत आहे. बँकेच्या कर्जवाटपाच्या आडमुठेपणाचा सरळ परिणाम बाजारपेठेवर पडत आहे. शेतकर्‍यांनी बियाणे व खत खरेदी करण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शांतता आहे.