शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गत हंगामातील नुकसानाचे कृषी बाजारपेठेवर सावट

By admin | Updated: June 15, 2015 02:08 IST

ना पुनर्गठन ना कर्ज, शेतक-यांकडे पैसेच नाहीत.

विवेक चांदूरकर / अकोला: गतवर्षी दोन्ही हंगाम हातून गेले. पेरणी तर दूरच कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठीही पैसे नाहीत. अशातच बँका कर्ज पुनर्गठन करण्यात आडकाठी आणीत असल्यामुळे शेतकर्‍यांपुढे पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या पीक नुकसानाचे सरळ पडसाद यावर्षी कृषी बाजारपेठेवर पडत आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांना खरीप हंगामासाठी ३४४६७ लाख रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. यापैकी केवळ १२ टक्के ४४१९ लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकेला ८७५७८ लाख रुपयांचे लक्ष्य असून, त्यांनी ४७३२६ लाख म्हणजे ३३ टक्के कर्जाचे वाटप केले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा झाला असून, जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. शेतकर्‍यांनी पेरणीसाठी मशागत करून जमीन सज्ज केली आहे. आता केवळ मॉन्सूनची वाट आहे. १७ ते १८ जून रोजी मॉन्सून दाखल होणार असून, शेतकरी पेरणी करणार आहेत. मात्र, शेतकर्‍यांकडे पेरणी करण्यासाठी, पिकांना खत देण्यासाठी पैसेच नाहीत. दुसरीकडे बँका कर्ज पुनर्गठनास टाळाटाळ करीत आहेत. शेतकरी बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी ये-जा करीत आहेत. मात्र, बँका त्यांना पुनर्गठन करण्यास नकार देत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ १२ टक्केच कर्जवाटप केले आहे. त्यामुळे बँकांना कर्जवाटप करायचेच नाही, असे निदर्शनास येत आहे. बँकेच्या कर्जवाटपाच्या आडमुठेपणाचा सरळ परिणाम बाजारपेठेवर पडत आहे. शेतकर्‍यांनी बियाणे व खत खरेदी करण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शांतता आहे.