शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यात ४ हजार ७७० हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 10:53 IST

Damage to crops in 4,770 hectares in Akola district अकोट तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ५० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांपासून जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. काढणीस आलेला गहू, कांदा पिके जमीनदोस्त झाली.कोला, तेल्हारा, बाळापूर तालुक्यात नुकसान नाही.

अकोला : अवकाळी पावसाने शेतीच्या कामामध्ये व्यत्यय आणला. काही ठिकाणी गहू, हरभरा काढणी सुरू असून शेतमाल भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला. जिल्ह्यात ४ हजार ७७० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने प्राथमिक अहवालात सांगितले आहे. अकोट तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ५० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळाबरोबरच गारपीट झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा व तीळ ही पिके उभी आहेत. तर गहू, हरभरा या पिकासह काही ठिकाणी कांदा पिकाची काढणी सुरू आहे. बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोट तालुक्यात गहू, लिंबू, पपई, कांदा बियाणे पीक, आंबा, कांदा, हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. काढणीस आलेला गहू, कांदा पिके जमीनदोस्त झाली. काढलेला कांदा व गहू या अचानक आलेल्या पावसामुळे भिजला. निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण शेती पिकांचे मोठे नुकसान केले. १९ व २० मार्च रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने विभागीय कृषी संचालक यांना सादर केला आहे.

 

 

तालुकानिहाय झालेले नुकसान

बार्शीटाकळी

११.८२ हेक्टर

मूर्तिजापूर

११३.१० हेक्टर

अकोट

४,०५० हेक्टर

पातूर

५९५.४२ हेक्टर

 

अकोला, तेल्हारा, बाळापूर तालुका निरंक

कृषी विभागाने १९ व २० मार्च रोजी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यामध्ये अकोला, तेल्हारा, बाळापूर तालुक्यात नुकसान झाले नसल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीRainपाऊस