शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावांत शेतकऱ्यांनी बंद केला मूग, उडीद, ज्वारीचा पेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:00 IST

अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये शेतकºयांनी गत पाच वर्षांपासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांची पेरणीच बंद केली आहे.

ठळक मुद्देरामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव इत्यादी सहा गावांमधील शेतकºयांनी सन २०१३ पासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी या खरीप पिकांची पेरणी करणेच बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. हरिणांचे कळप आणि रानटी डुक्कर हैदोस घालून पिकांचे प्रचंड नुकसान करतात.

- संतोष येलकर

अकोला : रानटी डुक्कर आणि हरिणांच्या हैदोसाने होणारे पिकांचे नुकसान आणि या वन्य प्राण्यांच्या जीवघेण्या हल्ल्यांच्या त्रासामुळे अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये शेतकºयांनी गत पाच वर्षांपासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांची पेरणीच बंद केली आहे.हरिणांचे कळप आणि रानटी डुक्कर हैदोस घालून पिकांचे प्रचंड नुकसान करतात. या वन्य प्राणांच्या हैदोसाने मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांचे शंभर टक्के होत असलेले नुकसान आणि वन्य प्राण्यांकडून शेतकºयांवर जीवघेणे हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यात अकोला तालुक्यातील रामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव इत्यादी सहा गावांमधील शेतकºयांनी सन २०१३ पासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी या खरीप पिकांची पेरणी करणेच बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. शेतकºयांनी पेरा बंद केल्याने गत पाच वर्षांपासून संबंधित सहा गावांच्या शेतशिवारांत मूग, उडीद व हायब्रीड ज्वारीचे पीक दिसेनासे झाले आहे. मूग, उडीद, हायब्रीड ज्वारीचा पेरा बंद करून, या भागातील शेतकरी सोयाबीन, कपाशी व तूर इत्यादी खरीप पिके घेत आहेत.कपाशी पिकाचेही नुकसान;शेतकरी संकटात!अकोला तालुक्यातील रामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदामपूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव या गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हैदोसाला कंटाळून शेतकºयांनी मूग, उडीद, ज्वारी पिकाचा पेरा गत पाच वर्षांपासून बंद केला. त्यानंतर आता वन्य प्राणी कपाशी पिकाच्या बोंड्या फस्त करीत आहेत. कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने,या भागातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.चाºयाचा प्रश्न; शेतकºयांवरजनावरे विकण्याची वेळमूग, उडिदासह हायब्रीड ज्वारीचा पेरा बंद केल्याने, संबंधित सहा गावांमध्ये जनावरांच्या चाºयासाठी लागणारा कडबा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये जनावरांच्या चाºयाचा प्रश्न उद्भवत असल्याने, जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.जीव धोक्यात टाकून शेतकºयांनाचकरावा लागतो पिकांचा बचाव!वन्य प्राण्यांच्या हैदोसापासून पिके वाचविण्यासाठी शासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने, जीव धोक्यात टाकून शेतकºयांनाच पिकांचा बचाव करावा लागत आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात फटाके फोडणे, धुºयावर जाळ करणे इत्यादी उपाययोजना शेतकºयांना कराव्या लागत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी