शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सहा गावांत शेतकऱ्यांनी बंद केला मूग, उडीद, ज्वारीचा पेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:00 IST

अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये शेतकºयांनी गत पाच वर्षांपासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांची पेरणीच बंद केली आहे.

ठळक मुद्देरामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव इत्यादी सहा गावांमधील शेतकºयांनी सन २०१३ पासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी या खरीप पिकांची पेरणी करणेच बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. हरिणांचे कळप आणि रानटी डुक्कर हैदोस घालून पिकांचे प्रचंड नुकसान करतात.

- संतोष येलकर

अकोला : रानटी डुक्कर आणि हरिणांच्या हैदोसाने होणारे पिकांचे नुकसान आणि या वन्य प्राण्यांच्या जीवघेण्या हल्ल्यांच्या त्रासामुळे अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये शेतकºयांनी गत पाच वर्षांपासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांची पेरणीच बंद केली आहे.हरिणांचे कळप आणि रानटी डुक्कर हैदोस घालून पिकांचे प्रचंड नुकसान करतात. या वन्य प्राणांच्या हैदोसाने मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांचे शंभर टक्के होत असलेले नुकसान आणि वन्य प्राण्यांकडून शेतकºयांवर जीवघेणे हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यात अकोला तालुक्यातील रामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव इत्यादी सहा गावांमधील शेतकºयांनी सन २०१३ पासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी या खरीप पिकांची पेरणी करणेच बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. शेतकºयांनी पेरा बंद केल्याने गत पाच वर्षांपासून संबंधित सहा गावांच्या शेतशिवारांत मूग, उडीद व हायब्रीड ज्वारीचे पीक दिसेनासे झाले आहे. मूग, उडीद, हायब्रीड ज्वारीचा पेरा बंद करून, या भागातील शेतकरी सोयाबीन, कपाशी व तूर इत्यादी खरीप पिके घेत आहेत.कपाशी पिकाचेही नुकसान;शेतकरी संकटात!अकोला तालुक्यातील रामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदामपूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव या गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हैदोसाला कंटाळून शेतकºयांनी मूग, उडीद, ज्वारी पिकाचा पेरा गत पाच वर्षांपासून बंद केला. त्यानंतर आता वन्य प्राणी कपाशी पिकाच्या बोंड्या फस्त करीत आहेत. कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने,या भागातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.चाºयाचा प्रश्न; शेतकºयांवरजनावरे विकण्याची वेळमूग, उडिदासह हायब्रीड ज्वारीचा पेरा बंद केल्याने, संबंधित सहा गावांमध्ये जनावरांच्या चाºयासाठी लागणारा कडबा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये जनावरांच्या चाºयाचा प्रश्न उद्भवत असल्याने, जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.जीव धोक्यात टाकून शेतकºयांनाचकरावा लागतो पिकांचा बचाव!वन्य प्राण्यांच्या हैदोसापासून पिके वाचविण्यासाठी शासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने, जीव धोक्यात टाकून शेतकºयांनाच पिकांचा बचाव करावा लागत आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात फटाके फोडणे, धुºयावर जाळ करणे इत्यादी उपाययोजना शेतकºयांना कराव्या लागत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी