शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावांत शेतकऱ्यांनी बंद केला मूग, उडीद, ज्वारीचा पेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:00 IST

अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये शेतकºयांनी गत पाच वर्षांपासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांची पेरणीच बंद केली आहे.

ठळक मुद्देरामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव इत्यादी सहा गावांमधील शेतकºयांनी सन २०१३ पासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी या खरीप पिकांची पेरणी करणेच बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. हरिणांचे कळप आणि रानटी डुक्कर हैदोस घालून पिकांचे प्रचंड नुकसान करतात.

- संतोष येलकर

अकोला : रानटी डुक्कर आणि हरिणांच्या हैदोसाने होणारे पिकांचे नुकसान आणि या वन्य प्राण्यांच्या जीवघेण्या हल्ल्यांच्या त्रासामुळे अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये शेतकºयांनी गत पाच वर्षांपासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांची पेरणीच बंद केली आहे.हरिणांचे कळप आणि रानटी डुक्कर हैदोस घालून पिकांचे प्रचंड नुकसान करतात. या वन्य प्राणांच्या हैदोसाने मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांचे शंभर टक्के होत असलेले नुकसान आणि वन्य प्राण्यांकडून शेतकºयांवर जीवघेणे हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यात अकोला तालुक्यातील रामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव इत्यादी सहा गावांमधील शेतकºयांनी सन २०१३ पासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी या खरीप पिकांची पेरणी करणेच बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. शेतकºयांनी पेरा बंद केल्याने गत पाच वर्षांपासून संबंधित सहा गावांच्या शेतशिवारांत मूग, उडीद व हायब्रीड ज्वारीचे पीक दिसेनासे झाले आहे. मूग, उडीद, हायब्रीड ज्वारीचा पेरा बंद करून, या भागातील शेतकरी सोयाबीन, कपाशी व तूर इत्यादी खरीप पिके घेत आहेत.कपाशी पिकाचेही नुकसान;शेतकरी संकटात!अकोला तालुक्यातील रामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदामपूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव या गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हैदोसाला कंटाळून शेतकºयांनी मूग, उडीद, ज्वारी पिकाचा पेरा गत पाच वर्षांपासून बंद केला. त्यानंतर आता वन्य प्राणी कपाशी पिकाच्या बोंड्या फस्त करीत आहेत. कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने,या भागातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.चाºयाचा प्रश्न; शेतकºयांवरजनावरे विकण्याची वेळमूग, उडिदासह हायब्रीड ज्वारीचा पेरा बंद केल्याने, संबंधित सहा गावांमध्ये जनावरांच्या चाºयासाठी लागणारा कडबा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये जनावरांच्या चाºयाचा प्रश्न उद्भवत असल्याने, जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.जीव धोक्यात टाकून शेतकºयांनाचकरावा लागतो पिकांचा बचाव!वन्य प्राण्यांच्या हैदोसापासून पिके वाचविण्यासाठी शासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने, जीव धोक्यात टाकून शेतकºयांनाच पिकांचा बचाव करावा लागत आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात फटाके फोडणे, धुºयावर जाळ करणे इत्यादी उपाययोजना शेतकºयांना कराव्या लागत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी