शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकांवर गर्दी वाढली; बस कधी वाढणार?

By atul.jaiswal | Updated: February 8, 2022 11:24 IST

ST Strike : बसस्थानकांवरही गर्दी वाढू लागली आहे; परंतु त्या प्रमाणात बस रस्त्यावर नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देपाच आगारांच्या ३७ बस रस्त्यावर मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा गजबजतेय

- अतुल जयस्वाल

अकोला : राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी शासकीय सेवेत विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी गत तीन महिन्यांपासून संपावर असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. कारवाईच्या बडग्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने जिल्ह्यातील सर्वच आगारांमधून बस सुरू करण्यात आल्या आहेत. परिणामी बसस्थानकांवरही गर्दी वाढू लागली आहे; परंतु त्या प्रमाणात बस रस्त्यावर नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.

 

जिल्ह्यात संपावर असलेले काही कर्मचारी कामावर रुजू झाले असले तरी बहुतांश कर्मचारी अजूनही संपात सहभागी आहेत. तोकड्या मनुष्यबळावर प्रवासी वाहतूक सेवा सुरळीत करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

जिल्ह्यातील पाच आगारांमध्ये एकूण १८१ बस आहेत. यापैकी सध्या केवळ ३६ बस रस्त्यावर धावत आहेत. अकोला व अकोट आगारातून सर्वाधिक १३-१३ बस प्रवाशांना वाहतूक सेवा देत आहेत. अकोट आगाराच्या सहा बस अकोलासाठी १२ फेऱ्या करीत आहेत. अकोला आगार क्र. १ मधून सहा बस रस्त्यावर धावत आहेत. यापैकी परतवाडा व खामगाव बसना प्रतिसाद मिळत आहे. तेल्हारा व मूर्तिजापूर आगारातून अनुक्रमे एक व चार बस रस्त्यावर धावत आहेत.

जिल्ह्यात किती धावत आहेत बस?

साधी बस - ३७

हिरकणी - ००

शिवशाही - ००

स्लीपर - ००

एकूण - ३७

 

आगार - एकूण बसेस - सध्या धावत असलेल्या बस

अकोला क्र. १ - ४० - ६

अकोला क्र. २ - ४९ - १३

अकोट            - ४५ - १३

तेल्हारा            - २८ -            १

मूर्तिजापूर - १९ -             ४

 

अकोला स्थानकावरून अमरावती, बुलडाणासाठी बस

अकोला आगार क्र. २ च्या १३ बस अमरावती, बुलडाणा व मलकापूर या मार्गावर धावत आहेत. याशिवाय अकोट, मूर्तिजापूर, मंगरुळपीर, वाशिम, औरंगाबाद, जालना, अंबड या आगरांच्या बस मध्यवर्ती बसस्थानकावर येत आहेत. दररोज एकूण ८० फेऱ्या होत आहेत. आगाराच्या बस दररोज २५०० किलोमीटर धावत असून, १ लाख २५ हजारांपर्यंत उत्पन्न होत आहे.

प्रवाशांचा वैताग

 

अजूनही पुरेशा गाड्या नसल्याने बसस्थानकावर तासन् तास ताटकळत बसावे लागत आहे. ट्रॅव्हल्सने जायचे म्हटले तर अधिक तिकिट मोजावे लागते. ग्रामीण भागात जाण्यासाठी बसेस सुरू झाल्या पाहिजे.

 

- दत्ता काळमेघ, प्रवासी

 

केवळ मोठ्या शहरांमध्येच जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील लोकांना अजूनही खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे. संपावर तोडगा काढून बससेवा सुरू व्हायला हवी.

 

- विनायक देशमुख, प्रवासी

 

दहा टक्के फेऱ्या पूर्ववत

 

अजूनही बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. उपलब्ध मनुष्यबळानुसार बसफेऱ्यांचे नियोजन केले जात आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकावरून अनेक गाड्या सुरू झाल्या असून, दहा टक्के फेऱ्या पूर्ववत झाल्या आहेत, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Akola Bus Standअकोला बस स्थानकstate transportएसटीST Strikeएसटी संप