शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 11:19 IST

Crowd in Akola Market : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे मंगळवारी पहावयास मिळाले.

ठळक मुद्देकिराणा दुकानांमध्ये माेठ्या संख्येने ग्राहक असल्याचे दिसून आले. मजूर वर्गाची गावाकडे परत जाण्यासाठी एकच धांदल उडाली हाेती.

अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेता राज्य शासनाकडून काेणत्याही क्षणी लाॅकडाऊन लागू केले जाणार असल्याची शक्यता मंगळवारी सायंकाळी खरी ठरली. लाॅकडाऊन लागू हाेणार असल्याच्या धास्तीपाेटी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे मंगळवारी पहावयास मिळाले. यामध्ये किराणा दुकानांमध्ये माेठ्या संख्येने ग्राहक असल्याचे दिसून आले.

काेराेना विषाणूचा वेगाने हाेणारा प्रसार लक्षात घेता २४ मार्च २०२० राेजी केंद्र शासनाने काेराेनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून लाॅकडाऊन लागू केले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अचानक लाॅकडाऊनची घाेषणा केल्यामुळे हातावर पाेट असणाऱ्या मजूर वर्गाची गावाकडे परत जाण्यासाठी एकच धांदल उडाली हाेती. दरम्यान, राज्यात काेराेनाचा प्रभाव ओसरत असल्याचे पाहून शासनाने १ जूनपासून टप्प्याटप्प्याने ‘अनलाॅक’ला सुरुवात केली हाेती. काेराेना संपण्याची चिन्हं दिसत असतानाच जानेवारी महिन्यापासून पुन्हा एकदा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समाेर आले आहे. वर्तमानस्थिती लक्षात घेता राज्यात काेराेनाची माेठी लाट आली असून, शासकीय वैद्यकीय यंत्रणा असाे वा खासगी रुग्णालयांमध्ये काेराेनाबाधित रुग्णांसाठी खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन व अत्यावश्यक औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रसाराला नागरिकांचा गाफीलपणा कारणीभूत ठरला आहे. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने मध्यंतरी ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केले हाेते. बिकट परिस्थिती लक्षात घेता काेणत्याही क्षण लाॅकडाऊनची घाेषणा हाेण्याची दाट शक्यता गृहीत धरून अकाेलेकरांनी मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र हाेते.

 

बाजारात उसळली गर्दी

राज्य सरकारकडून किमान १५ दिवसांचा लाॅकडाऊन लागू केला जाणार असला तरी यामध्ये वाढ हाेण्याच्या विचारातून सर्वसामान्य नागरिकांनी कडधान्य खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. शहरातील दाणा बाजारात गहू, ज्वारीसह उडीद दाळ, मूग दाळ, हरभरा दाळ, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड हाेती.

 

लाॅकडाऊनची शक्यता गृहीत धरून नाेकरवर्गाने महिनाभर पुरेल इतका किराणा घेतला; परंतु हातावर पाेट असणाऱ्यांनी किमान आठ दिवस पुरेल एवढेच साहित्य खरेदी केले. यावरून नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे दिसून येते. शासनाने लाॅकडाऊनच्या निर्बंधातून किराणा दुकानांना वगळल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

- राजेश शेळके, व्यावसायिक, किराणा दुकान

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक