शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पिके पडू लागली पिवळी; शेतकरी चिंतेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:20 IST

पिकांच्या लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.

- संतोष येलकर

अकोला : गेल्या दीड महिन्यांपासून सतत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.गतवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने, शेतकरी संकटात सापडला होता. यावर्षीच्या खरीप हंगामात पिकांचे समाधानकारक उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात आली; मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने, जिल्ह्यातील बहुतांश भागात मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. विलंबाने सुरू झालेल्या रिमझिम पावसात कपाशी, सोयाबीन, तूर व इतर पिकांच्या पेरण्या उरकल्यानंतर पावसात खंड पडला होता. त्यानंतर गत २६ जुलैपासून जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. सतत ढगाळ वातावरण आणि कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस बरसत असल्याने, जिल्ह्यात कपाशी, तूर व सोयाबीन इत्यादी पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही वसूल होणार की नाही, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.तण वाढले; निंदन, डवरणी थांबली !पाऊस सतत हजेरी लावत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. पाऊस सुरू असल्याने निंदन, वखरणी, डवरणी इत्यादी कामे थांबली आहेत. त्यामुळे पिकांमध्ये तण (गवत ) वाढत असल्याने, पिके धोक्यात आली आहेत.कीड-रोगांचा प्रादुर्भाव; फुलोर-शेंगा गळू लागल्या!सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कपाशी, तूर व सोयाबीन या पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी, लष्करी अळी इत्यादी कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे . कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचा फुलोर आणि शेंगा गळू लागल्या आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.लागवडीचा खर्च वाढला!ढगाळ वातावरण आणि सुरू असलेल्या पावसामुळे पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने, निंदण, डवरणी व वखरणी तसेच पिकांवरील कीड व रोगांच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी इत्यादी पीक लागवडीचा खर्च वाढला आहे. लागवडीचा खर्च वाढला असला तरी, पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने, लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत, तसेच पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी अशा कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिकांमध्ये तण (गवत) मोठ्या प्रमाणात वाढले असून, पावसामुळे निंदण, डवरणी, वखरणी अशी कामे थांबली आहेत. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटणार असून, लागवडीचा खर्चही वसूल होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने पिकांचा सर्व्हे करून, शेतकºयांना मदत मिळाली पाहिजे.-मनोज तायडेशेतकरी, कौलखेड जहागीर.ढगाळ वातावरण व सतत पाऊस सुरू असल्याने कपाशी, तूर, सोयाबीन इत्यादी पिके पिवळी पडू लागली आहेत. कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीनचा फुलोर व शेंगा गळून पडत आहेत. पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पिकांच्या लागवडीचा खर्च वाढला; मात्र लागवडीवर केलेला खर्च निघणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे पिकांचा सर्व्हे करून, शेतकºयांना मदत देण्यासंदर्भात उपाययोजना झाली पाहिजे.-शिवाजीराव भरणेशेतकरी, रामगाव.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी