शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

पिके पडू लागली पिवळी; शेतकरी चिंतेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:20 IST

पिकांच्या लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.

- संतोष येलकर

अकोला : गेल्या दीड महिन्यांपासून सतत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.गतवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने, शेतकरी संकटात सापडला होता. यावर्षीच्या खरीप हंगामात पिकांचे समाधानकारक उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात आली; मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने, जिल्ह्यातील बहुतांश भागात मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. विलंबाने सुरू झालेल्या रिमझिम पावसात कपाशी, सोयाबीन, तूर व इतर पिकांच्या पेरण्या उरकल्यानंतर पावसात खंड पडला होता. त्यानंतर गत २६ जुलैपासून जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. सतत ढगाळ वातावरण आणि कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस बरसत असल्याने, जिल्ह्यात कपाशी, तूर व सोयाबीन इत्यादी पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही वसूल होणार की नाही, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.तण वाढले; निंदन, डवरणी थांबली !पाऊस सतत हजेरी लावत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. पाऊस सुरू असल्याने निंदन, वखरणी, डवरणी इत्यादी कामे थांबली आहेत. त्यामुळे पिकांमध्ये तण (गवत ) वाढत असल्याने, पिके धोक्यात आली आहेत.कीड-रोगांचा प्रादुर्भाव; फुलोर-शेंगा गळू लागल्या!सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कपाशी, तूर व सोयाबीन या पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी, लष्करी अळी इत्यादी कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे . कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचा फुलोर आणि शेंगा गळू लागल्या आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.लागवडीचा खर्च वाढला!ढगाळ वातावरण आणि सुरू असलेल्या पावसामुळे पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने, निंदण, डवरणी व वखरणी तसेच पिकांवरील कीड व रोगांच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी इत्यादी पीक लागवडीचा खर्च वाढला आहे. लागवडीचा खर्च वाढला असला तरी, पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने, लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत, तसेच पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी अशा कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिकांमध्ये तण (गवत) मोठ्या प्रमाणात वाढले असून, पावसामुळे निंदण, डवरणी, वखरणी अशी कामे थांबली आहेत. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटणार असून, लागवडीचा खर्चही वसूल होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने पिकांचा सर्व्हे करून, शेतकºयांना मदत मिळाली पाहिजे.-मनोज तायडेशेतकरी, कौलखेड जहागीर.ढगाळ वातावरण व सतत पाऊस सुरू असल्याने कपाशी, तूर, सोयाबीन इत्यादी पिके पिवळी पडू लागली आहेत. कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीनचा फुलोर व शेंगा गळून पडत आहेत. पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पिकांच्या लागवडीचा खर्च वाढला; मात्र लागवडीवर केलेला खर्च निघणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे पिकांचा सर्व्हे करून, शेतकºयांना मदत देण्यासंदर्भात उपाययोजना झाली पाहिजे.-शिवाजीराव भरणेशेतकरी, रामगाव.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी