शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अकोला जिल्ह्यात २.१७ लाख शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:09 IST

पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकऱ्यांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. पीक नुकसानाचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून, पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले आहेत. तसेच कापणीला आलेली ज्वारी काळीभोर झाली असून, कापणी झालेल्या ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले. वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आणि पात्या-फुलेही गळून पडली आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकांद्वारे गत ३० आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले. जिल्ह्यात १ हजार ६ गावांच्या शिवारात २ लाख ९३ हजार ५८८ शेतकºयांच्या ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील १ हजार ६ गावांच्या शिवारात ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, अवकाळी पावसाच्या तडाख्यात या सर्व क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस व ज्वारी पीक नुकसानाचा समावेश आहे.

शेतशिवारांत पाणी अन् चिखल; पंचनाम्यांसाठी पथकांची कसरत!सतत बरसणाºया अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतशिवारांमध्ये पावसाचे पाणी आणि चिखल साचला आहे. त्यामुळे शेतांमधील पाण्यातून वाट काढत आणि चिखल तुडवित पीक नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पथकांमार्फत सुरू आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमध्ये २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण केल्यानंतर पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी