शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अकोला जिल्ह्यात २.१७ लाख शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:09 IST

पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकऱ्यांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. पीक नुकसानाचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून, पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले आहेत. तसेच कापणीला आलेली ज्वारी काळीभोर झाली असून, कापणी झालेल्या ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले. वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आणि पात्या-फुलेही गळून पडली आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकांद्वारे गत ३० आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले. जिल्ह्यात १ हजार ६ गावांच्या शिवारात २ लाख ९३ हजार ५८८ शेतकºयांच्या ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील १ हजार ६ गावांच्या शिवारात ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, अवकाळी पावसाच्या तडाख्यात या सर्व क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस व ज्वारी पीक नुकसानाचा समावेश आहे.

शेतशिवारांत पाणी अन् चिखल; पंचनाम्यांसाठी पथकांची कसरत!सतत बरसणाºया अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतशिवारांमध्ये पावसाचे पाणी आणि चिखल साचला आहे. त्यामुळे शेतांमधील पाण्यातून वाट काढत आणि चिखल तुडवित पीक नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पथकांमार्फत सुरू आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमध्ये २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण केल्यानंतर पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी