शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला जिल्ह्यात २.१७ लाख शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:09 IST

पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकऱ्यांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. पीक नुकसानाचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून, पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले आहेत. तसेच कापणीला आलेली ज्वारी काळीभोर झाली असून, कापणी झालेल्या ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले. वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आणि पात्या-फुलेही गळून पडली आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकांद्वारे गत ३० आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले. जिल्ह्यात १ हजार ६ गावांच्या शिवारात २ लाख ९३ हजार ५८८ शेतकºयांच्या ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील १ हजार ६ गावांच्या शिवारात ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, अवकाळी पावसाच्या तडाख्यात या सर्व क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस व ज्वारी पीक नुकसानाचा समावेश आहे.

शेतशिवारांत पाणी अन् चिखल; पंचनाम्यांसाठी पथकांची कसरत!सतत बरसणाºया अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतशिवारांमध्ये पावसाचे पाणी आणि चिखल साचला आहे. त्यामुळे शेतांमधील पाण्यातून वाट काढत आणि चिखल तुडवित पीक नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पथकांमार्फत सुरू आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमध्ये २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण केल्यानंतर पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी