शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात २.१७ लाख शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:09 IST

पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकऱ्यांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. पीक नुकसानाचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून, पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले आहेत. तसेच कापणीला आलेली ज्वारी काळीभोर झाली असून, कापणी झालेल्या ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले. वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आणि पात्या-फुलेही गळून पडली आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकांद्वारे गत ३० आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले. जिल्ह्यात १ हजार ६ गावांच्या शिवारात २ लाख ९३ हजार ५८८ शेतकºयांच्या ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील १ हजार ६ गावांच्या शिवारात ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, अवकाळी पावसाच्या तडाख्यात या सर्व क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस व ज्वारी पीक नुकसानाचा समावेश आहे.

शेतशिवारांत पाणी अन् चिखल; पंचनाम्यांसाठी पथकांची कसरत!सतत बरसणाºया अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतशिवारांमध्ये पावसाचे पाणी आणि चिखल साचला आहे. त्यामुळे शेतांमधील पाण्यातून वाट काढत आणि चिखल तुडवित पीक नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पथकांमार्फत सुरू आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमध्ये २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण केल्यानंतर पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी