शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

काहीच नाही राहिलं; सगळं ‘अवकाळी’ने पळविलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:30 IST

अवकाळी पावसाच्या तडाख्यात काहीच नाही राहिलं; सगळं ‘अवकाळी’ने पळविलं, अशी व्यथा पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकापुढे मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील अकोला तालुक्यात म्हैसपूर, कापशी तलाव, गोरेगाव खुर्द, बाळापूर तालुक्यातील भरतपूर, नकाशी व वाडेगाव या सहा गावांना भेटी देऊन केंद्रीय पथकाने शनिवारी पीक नुकसानाची पाहणी केली. पिके चांगली होती, त्यामुळे यंदा पिकांचं उत्पादन चांगलं होण्याची अपेक्षा होती; मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्यात काहीच नाही राहिलं; सगळं ‘अवकाळी’ने पळविलं, अशी व्यथा पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकापुढे मांडली.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या खरीप पिकांसह भाजीपाला आणि फळ पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने केंद्रीय पथक प्रमुख आर. के.सिंग यांच्यासह अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील म्हैसपूर, कापशी तलाव, गोरेगाव खुर्द व बाळापूर तालुक्यातील भरतपूर, नकाशी व वाडेगाव या सहा गावांना भेटी देत, शेतातील पीक नुकसानाची पाहणी केली.पिकांच्या नुकसान झालेल्या संबंधित शेतकºयांसोबत चर्चा करून पीक नुकसानाची माहिती घेतली. त्यामध्ये म्हैसपूर येथे ज्वारी व सोयाबीन पीक नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाने केली. अवकाळी पावसाच्या तडाख्यात काळीभोर झालेली ज्वारी सडली, सोयाबीन सडले व कपाशीच्या बोंड्या सडल्या असून, पिकांचे काहीच राहिले नाही, असे शेतकरी गजानन अघडते यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाºयांना सांगितले.यंदा पीक चांगले होते, त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले होण्याची आशा होती; परंतु हाताशी आलेल्या सर्वच पिकांचे उत्पादन अवकाळी पावसाने पळविले, अशी व्यथा कापशी तलाव येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी विठ्ठल बिल्लेवार यांनी केंद्रीय पथकापुढे मांडली. यावेळी केंद्रीय पथकासमवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह संबंधित तलाठी व कृषी सहायक उपस्थित होते.

शेतकºयाने दाखविले सोयाबीनचे सडलेले दाणे!म्हैसपूर येथील पीक नुकसानाच्या पाहणीदरम्यान अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाच्या नुकसानाची माहिती देत, शेतकरी संजय अघडते यांनी सोयाबीनच्या शेंगांमधील सडलेले सोयाबीनचे दाणे काढून केंद्रीय पथकाला दाखविले. त्यानुषंगाने सडलेल्या सोयाबीनची पाहणी पथकाने केली.

पीक नुकसानाच्या पंचनाम्याची प्रत मागितली!म्हैसपूर येथे ज्वारी पिकाच्या नुकसानाची पाहणी करताना, संबंधित शेतातील पीक नुकसानाचा पंचनामा करण्यात आला का, केव्हा केला, यासंदर्भात विचारणा करीत पीक नुकसानाच्या पंचनाम्याची प्रत केंद्रीय पथकाने मागितली. त्यानुसार संबंधित कर्मचाºयांनी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची प्रत पथकाला दाखविली.

लिंबू, पपईचा बहर झडला!केंद्रीय पथकाने कापशी तलाव शिवारातील पुरुषोत्तम चतरकर व प्रकाश चतरकर यांच्या लिंबू व पपई बागेची पाहणी करीत नुकसानाची माहिती घेतली. अवकाळी पावसाच्या तडाख्यात मृग व हस्त बहर झडल्याने लिंबू पिकाचे आणि दुसरा बहर झडल्याने पपई पिकाचे उत्पादन बुडाल्याची व्यथा शेतकºयांनी केंद्रीय पथकापुढे मांडली.

पीक विम्याचा लाभ द्या!पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकºयांना पीक विमाच्या लाभ आणि सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी गोरेगाव येथील शेतकरी संतोष वाकोडे यांच्यासह शेतकºयांनी पथकाकडे केली.

सरपंच, पोलीस पाटलाकडून घेतली नुकसानाची माहिती!कापशी रोड येथे गणेश चतरकर यांच्या शेतात कापूस पीक नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाने केली. पीक नुकसानासंदर्भात कापूस उत्पादक शेतकºयासोबत चर्चा करून, पीक नुकसानाच्या पंचनाम्याची माहिती संबंधित सरपंच व पोलीस पाटील यांच्याकडून घेतली.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती