शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

 खरिपाच्या तोंडावर केवळ १४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 13:40 IST

अकोला : खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत असून, कर्ज मिळत नसल्याने खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना चिंता सतावत आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गत १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले. १ जूनपर्यंत जिल्ह्यात ३ लाख १६ हजार खातेदार शेतकºयांपैकी केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना १३३ कोटी ३८ लाख ५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

- संतोष येलकर

अकोला : खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १ जूनपर्यंत अकोला जिल्ह्यात केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत असून, कर्ज मिळत नसल्याने खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गत १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले; परंतु खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १ जूनपर्यंत जिल्ह्यात ३ लाख १६ हजार खातेदार शेतकºयांपैकी केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना १३३ कोटी ३८ लाख ५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. नाफेडमार्फत तूर, हरभरा खरेदी बंद करण्यात आली असून, खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे प्रलंबित असताना, पीक कर्जही मिळत नसल्याने, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व जमीन मशागतीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता सतावत आहे.तीन लाखांवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कर्ज मिळणार?खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप दोन महिन्यांपूर्वी बँकांमार्फत सुरू करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ३ लाख १६ हजार खातेदार शेतकºयांपैकी १ जूनपर्यंत केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आले. उर्वरित तीन लाखापेक्षा जास्त शेतकºयांना अद्याप पीक कर्जाचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे खरीप पेरणीपूर्वी जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज मिळणार की नाही, तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी