शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

 खरिपाच्या तोंडावर केवळ १४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 13:40 IST

अकोला : खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत असून, कर्ज मिळत नसल्याने खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना चिंता सतावत आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गत १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले. १ जूनपर्यंत जिल्ह्यात ३ लाख १६ हजार खातेदार शेतकºयांपैकी केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना १३३ कोटी ३८ लाख ५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

- संतोष येलकर

अकोला : खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १ जूनपर्यंत अकोला जिल्ह्यात केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत असून, कर्ज मिळत नसल्याने खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गत १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले; परंतु खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १ जूनपर्यंत जिल्ह्यात ३ लाख १६ हजार खातेदार शेतकºयांपैकी केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना १३३ कोटी ३८ लाख ५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. नाफेडमार्फत तूर, हरभरा खरेदी बंद करण्यात आली असून, खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे प्रलंबित असताना, पीक कर्जही मिळत नसल्याने, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व जमीन मशागतीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता सतावत आहे.तीन लाखांवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कर्ज मिळणार?खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप दोन महिन्यांपूर्वी बँकांमार्फत सुरू करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ३ लाख १६ हजार खातेदार शेतकºयांपैकी १ जूनपर्यंत केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आले. उर्वरित तीन लाखापेक्षा जास्त शेतकºयांना अद्याप पीक कर्जाचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे खरीप पेरणीपूर्वी जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज मिळणार की नाही, तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी