शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

अकोला जिल्ह्यात २.६८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 10:48 IST

जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, मूग व उडीद पिकांचा विमा काढण्यात आला. पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून विमा हप्त्यापोटी (प्रीमियम) १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम अ‍ॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीकडे जमा करण्यात आली; परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसात खंड पडल्याने जिल्ह्यात मूग, उडिदाचे पीक बुडाले. त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी कोंब फुटले. ज्वारी काळीभोर पडली असून, कोंब फुटले. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक पंचनाम्यांच्या अहवालानुसार जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकºयांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सर्वच शेतकºयांचे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे; परंतु पीक विमा धोरणाच्या निकषांनुसार जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा दाव्याची रक्कम ७०८ कोटी!जिल्ह्यातील सातही तालुक्यात २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला असून, विमा हप्त्यापोटी १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे जमा करण्यात आली आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या पीक विमा दाव्याची एकूण रक्कम ७०८ कोटी ३९ लाख रुपये इतकी होते. जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने, पीक विमा दाव्याची रक्कम शेतकºयांना मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी