शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात २.६८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 10:48 IST

जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, मूग व उडीद पिकांचा विमा काढण्यात आला. पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून विमा हप्त्यापोटी (प्रीमियम) १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम अ‍ॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीकडे जमा करण्यात आली; परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसात खंड पडल्याने जिल्ह्यात मूग, उडिदाचे पीक बुडाले. त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी कोंब फुटले. ज्वारी काळीभोर पडली असून, कोंब फुटले. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक पंचनाम्यांच्या अहवालानुसार जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकºयांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सर्वच शेतकºयांचे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे; परंतु पीक विमा धोरणाच्या निकषांनुसार जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा दाव्याची रक्कम ७०८ कोटी!जिल्ह्यातील सातही तालुक्यात २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला असून, विमा हप्त्यापोटी १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे जमा करण्यात आली आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या पीक विमा दाव्याची एकूण रक्कम ७०८ कोटी ३९ लाख रुपये इतकी होते. जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने, पीक विमा दाव्याची रक्कम शेतकºयांना मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी