शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित वीज पुरवठ्यामुळे कपाशीचे पीक धोक्यात

By admin | Updated: June 6, 2014 22:20 IST

वीज वितरणच्या हलगर्जीबाबत शेतकर्‍यांत नाराजी

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यात जवळपास १ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी महागडे बियाणे आणून मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली असली तरी वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नवअंकुरीत कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. वीज वितरणचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पिकाकडे शेतकर्‍यांचा कल असल्याने व तेल्हारा तालुका हा बागायती क्षेत्रात मोडत असल्याने शेतकर्‍यांनी १० मे पासून मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली आहे. मात्र, विजेच्या लपंडावामुळे शेतकरी फार वैतागला आहे. कपाशीचे अंकुर कोमेजलेल्या स्थितीत दिसत आहेत. शेतकरी हरीण, माकडे हाकलता हाकलता थकून गेला. त्यात वीज मंडळाच्या हलगर्जीमुळे शेतातील पिके वाया जात असल्याने शेतकरी खचला आहे. त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक होण्याआधी वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवण्याची मागणी होत आहे.