शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘वंचित’च्या ‘कमळ’ आंदोलकांवर गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 10:57 IST

दुसरीकडे इतर पक्षाच्या आंदोलकांवर मात्र पोलिसांनी मेहरनजर दाखविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वंचित बहुजन आघाडीने रविवारी शहरातील ११ ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमधील साचलेल्या पाण्यात कमळाची फुले ठेवून आंदोलन केले. या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.एकीकडे वंचितच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले असतान दुसरीकडे इतर पक्षाच्या आंदोलकांवर मात्र पोलिसांनी मेहरनजर दाखविली आहे. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करताना असे शेकडो गुन्हे दाखल झाले तरी चालतील, असे स्पष्ट करत आंदोलनाबाबतचा हाच न्याय सर्व पक्षांना लावावा, अशी मागणी वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.वंचित बहुजन आघाडीने मनपामधील सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलन केले.त्यावर सिटी कोतवाली, रामदासपेठ, सिव्हिल लाइन्स आणि अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांविरोधात कलम १८८, १४३, २६९ सह १३५ आणि कोविड १९ साथ रोग नियंत्रण कायदा इतर कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत.ही आंदोलने बेदखल का?राष्ट्रवादीने बोगस बियाण्यांविरोधात कृषी अधिकारी कार्यालयात पेरणी केली आहे. काँग्रेसने याच मुद्यावर महाबीजमध्ये ठिय्या आंदोलन दिले आहे आणि वीज बिल विरोधात वीज मंडळ कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. सेनेच्या वतीने दोन वेळा जिल्हाभर रस्ता रोको आणि जुते मारो आंदोलने झाली आहेत. भाजपानेदेखील दोन वेळा जिल्हाभर दूध दरवाढ व इतर मुद्यांवर जवळजवळ ४२ ठिकाणी आंदोलने केली आहेत.कालही भाजपच्या उपमहापौर आणि काही पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. या राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनाला पोलीस परवानगी नव्हती; मात्र एकाही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नाही. केवळ वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लक्ष्य करून गुन्हे दाखल केले जात असतील तर पोलीस सत्ताधारी राजकीय पक्षाच्या हातचे बाहुले म्हणून काम करीत असल्याचा आरोप पातोडे यांनी केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण