शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'जननी'चा जागर सुरू असताना महिलांवरील अत्याचार वाढले;  १० महिन्यात ७८ बलात्कार अन् विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:05 IST

 अकोला: जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या जननी-२ च्या कार्यक्रमानंतरही जिल्ह्यात महिला व युवतींवर अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

ठळक मुद्दे२०१७ या वर्षात ६९ तर १० महिन्यात ५२ बलात्कार तथा विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. यावर्षीच्या केवळ १० महिन्यात तब्बल ७८ बलात्कार अन् विनयभंगाच्या घटना घडल्या. २०१३ मध्ये ४६ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर २०१४ मध्ये या घटनांची आकडेवारी ५३ होती.

- सचिन राऊत

 अकोला: जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या जननी-२ च्या कार्यक्रमानंतरही जिल्ह्यात महिला व युवतींवर अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. २०१७ या वर्षात ६९ तर १० महिन्यात ५२ बलात्कार तथा विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर यावर्षीच्या केवळ १० महिन्यात तब्बल ७८ बलात्कार अन् विनयभंगाच्या घटना घडल्याने महिलांवर अत्याचाराने कळस गाठल्याचे दिसून येत आहे.जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बलात्कार व विनयभंगाच्या घटनांसह महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच आहे. गत पाच वर्षांच्या आकडेवारीची तुलना केली तर यामध्ये २०१८ च्या महिन्यांच्या कालावधीतच अधिक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये ४६ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर २०१४ मध्ये या घटनांची आकडेवारी ५३ होती. त्यानंतर २०१५ मध्ये महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यात यश आल्याने केवळ ४४ बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हेच प्रमाण २०१६ मध्ये झपाट्याने वाढून जिल्ह्यातील महिला व मुलींवरील अत्याचाराच्या तब्बल ७० घटना घडल्या होत्या. २०१७ मध्ये ६९ गुन्हे घडले तर त्यानंतर २०१८ च्या केवळ १० महिन्यांच्या कालावधीत ७८ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्याने यामध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. अकोलापोलिसांकडून जननी-२ हा महिलांवरील अत्याचार आणि छळवणुकीचे प्रकार कमी करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे; मात्र त्यानंतरही महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच असल्याने पोलिसांचे प्रयत्न असफल ठरत असल्याचे वास्तव आहे. जनजागृती वाढल्याने गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ‘गुड टच आणि बॅड टच’ या घोषवाक्याद्वारे अकोला पोलिसांनी प्रत्येक शाळा-महाविद्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयासह बँकांमध्ये ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर जनजागृती केली. त्यामुळे महिला व मुलींमध्ये जागृती होऊन त्यांनी हे अत्याचार गप राहून सहन न करता त्याविरोधात आवाज उठविल्याने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. दोषसिद्धीचे प्रमाणही अधिकमहिला व मुलींवरील अत्याचार झाल्याचे प्रमाण वाढले असतानाच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी मेहनत घेऊन दोषसिद्धीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस