शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

'जननी'चा जागर सुरू असताना महिलांवरील अत्याचार वाढले;  १० महिन्यात ७८ बलात्कार अन् विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:05 IST

 अकोला: जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या जननी-२ च्या कार्यक्रमानंतरही जिल्ह्यात महिला व युवतींवर अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

ठळक मुद्दे२०१७ या वर्षात ६९ तर १० महिन्यात ५२ बलात्कार तथा विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. यावर्षीच्या केवळ १० महिन्यात तब्बल ७८ बलात्कार अन् विनयभंगाच्या घटना घडल्या. २०१३ मध्ये ४६ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर २०१४ मध्ये या घटनांची आकडेवारी ५३ होती.

- सचिन राऊत

 अकोला: जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या जननी-२ च्या कार्यक्रमानंतरही जिल्ह्यात महिला व युवतींवर अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. २०१७ या वर्षात ६९ तर १० महिन्यात ५२ बलात्कार तथा विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर यावर्षीच्या केवळ १० महिन्यात तब्बल ७८ बलात्कार अन् विनयभंगाच्या घटना घडल्याने महिलांवर अत्याचाराने कळस गाठल्याचे दिसून येत आहे.जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बलात्कार व विनयभंगाच्या घटनांसह महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच आहे. गत पाच वर्षांच्या आकडेवारीची तुलना केली तर यामध्ये २०१८ च्या महिन्यांच्या कालावधीतच अधिक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये ४६ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर २०१४ मध्ये या घटनांची आकडेवारी ५३ होती. त्यानंतर २०१५ मध्ये महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यात यश आल्याने केवळ ४४ बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हेच प्रमाण २०१६ मध्ये झपाट्याने वाढून जिल्ह्यातील महिला व मुलींवरील अत्याचाराच्या तब्बल ७० घटना घडल्या होत्या. २०१७ मध्ये ६९ गुन्हे घडले तर त्यानंतर २०१८ च्या केवळ १० महिन्यांच्या कालावधीत ७८ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्याने यामध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. अकोलापोलिसांकडून जननी-२ हा महिलांवरील अत्याचार आणि छळवणुकीचे प्रकार कमी करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे; मात्र त्यानंतरही महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच असल्याने पोलिसांचे प्रयत्न असफल ठरत असल्याचे वास्तव आहे. जनजागृती वाढल्याने गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ‘गुड टच आणि बॅड टच’ या घोषवाक्याद्वारे अकोला पोलिसांनी प्रत्येक शाळा-महाविद्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयासह बँकांमध्ये ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर जनजागृती केली. त्यामुळे महिला व मुलींमध्ये जागृती होऊन त्यांनी हे अत्याचार गप राहून सहन न करता त्याविरोधात आवाज उठविल्याने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. दोषसिद्धीचे प्रमाणही अधिकमहिला व मुलींवरील अत्याचार झाल्याचे प्रमाण वाढले असतानाच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी मेहनत घेऊन दोषसिद्धीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस