शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कापसाचे दर घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:37 IST

बाजारात कापसाचे दर ४,५०० ते ४,७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत; परंतु कापसाची आवक वाढल्यास हे दर घटण्याची शक्यता आहे.

अकोला: यावर्षी आयातीत कापसामुळे देशांतर्गत कापसाचे दर घटणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. आजमितीस खासगी बाजारात क ापसाचे दर प्रतिक्विंटल ४,९०० रुपये आहेत. हे दर यापेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शासनाने यावर्षी तरी कापूस उत्पादकांना बोनस द्यावा, असेही तज्ज्ञांचे मत आहे.देशात यावर्षी १ कोटी २२ लाख ३८ हजार ३६१ हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. तथापि, काही भागात कमी तर काही भागात जास्त असा पाऊस यावर्षी पडल्याने कापसावर प्रतिकूल परिणाम झाला. शासनाने जाहीर केलेल्या हमी दरात उत्पादन खर्चही निघणे कठीण असताना परदेशातून कापूस आयात करण्यात येत आहे. कारखानदारांना स्वस्तात कापूस उपलब्ध व्हावा, हा उदात्त हेतू यामागे असला तरी त्यासाठी येथील शेतकऱ्यांचे काय, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कापूस आयात करायचाच होता तर त्यावर आयात शुल्क वाढवणे गरजेचे होते. परदेशात उत्पादित शेत मालाला संरक्षण, अनुदान दिले जाते. त्या उपाययोजना येथील शेतकऱ्यांनाही देणे क्रमप्राप्त आहे.यावर्षी साडेतीन कोटी गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशातील कापूस भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळ हमी दराने खरेदी करणार आहे; परंतु सीसीआयकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करण्याइतपत यंत्रणा नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. प्रतवारीच्या निकषही लावल्या जातील. परिणामी शेतकºयांना बाजारात कापूस विक ण्यावाचून दुसरा पर्यायच नसल्याने यावर्षी शेतकºयांची लूट होण्याचीच शक्यता आहे. शासनाने हमी दर धाग्यांच्या लांबीनुसार प्रतिक्विंटल ५ हजार २५५ ते ५,५५० रुपये जाहीर करण्यात आले आहेत. या दराने कापूस खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू व्हायचे आहेत. त्यामुळे आजमितीस शेतकºयांना बाजारात कापूस विकावा लागत आहे. बाजारात कापसाचे दर ४,५०० ते ४,७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत; परंतु कापसाची आवक वाढल्यास हे दर घटण्याची शक्यता असल्याने शासनाने यावर्षी तरी कापूस उत्पादक शेतकºयांना सामाजिक सुरक्षितता म्हणून बोनस जाहीर करणेच गरजेचे आहे, असेही तज्ज्ञांना वाटते.

- कमी-जास्त पावसामुळे देशात कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी आयात बंद करावी किंवा परेदशाप्रमाणे कपाशीला संरक्षण द्यावे.डॉ. शरदराव निंबाळकर,कापूस अभ्यासक तथा माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसFarmerशेतकरी