शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पीक; मराठवाड्यात क्षेत्र घटले, विदर्भात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 13:52 IST

अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे

अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे. अल्प पावसामुळे मराठवाड्यातील कापसाचे क्षेत्र घटले तर विदर्भातील कापसाचे क्षेत्र मात्र ७० हजार हेक्टरने वाढले आहे. पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञाकरवी वर्तविण्यात येत आहे.यावर्षी राज्यात ४१ लाख ९१ हजार १४४ हेक्टरवर कपाशी पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. तथापि ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर म्हणजेच १०० टक्के पेरणी आटोेपली आहे. मराठवाड्यात मात्र कपाशीचे क्षेत्र घटले असून, पावसाच्या अनिश्चिततेमुळे लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात कापूस पेरणीवर परिणाम झाला आहे. मराठवाड्यात यावर्षी १७ लाख ७५ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात १४ लाख ८८ हजार हेक्टरवरच पेरणी झाली. उत्तर महाराष्ट्र खान्देशात ८ लाख ६० हजार १०१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशी पेरणी केली, तर विदर्भात सर्वात जास्त १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मराठवाड्यातील कपाशी पेरणीची झीज विदर्भ,खान्देशाने भरू न काढल्याने आकडेवारीवरू न दिसते.विदर्भातील अमरावती विभागातील शेतकºयांनी यावर्षी मूग,उडीद पिकांची पेरणी न करता कापूस पेरणीवर भर दिला तर नागपूर विभागातील शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कापूस पीक पेरणी केली.पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी शेतकºयांनी हा निर्णय घेतल्याचे कृषी तज्ज्ञाकरवी सांगण्यात येत असले तरी मागच्यावर्षीही पाऊस कमीच होता. तथापि, मागच्यावर्षीच्या खरीप हंगामातील कपाशी पिकाला जे दर मिळाले ते समाधानकारक होते. बोंडअळीचा प्रादुर्भावही कमी असल्याने कापसाची प्रत चांगली होती. यावर्षी मराठवाडा व विदर्भात खूपच कमी पाऊस झाला. विदर्भात कापूस पीक पेरणीला विलंब झाला. त्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारली.आताही पावसात दम नसून, काही भागात तुरळक तर काही भागात काहीच पाऊस नाही, अशी स्थिती आहे.याचा परिणाम कापूस उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

 अगोदर पाऊस लांबल्याने उशिरा पेरणी केलेल्या कपाशीची वाढ खुंटली होती. आता १२ दिवसांपासून ढगाळ वातावरण व अधूनमधून तुरळक पाऊस असून, शेतकºयांना पिकावर फवारणी करता येत नसल्याने अळ््या, कि डींचा प्रादुुर्भाव वाढत आहे.असेच वातावरण आणखी राहिल्यास कपाशी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.डॉ.मोहन खाकरे,माजी ज्येष्ठ विद्यावेत्ता,शास्त्रज्ञ,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी