शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पीक; मराठवाड्यात क्षेत्र घटले, विदर्भात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 13:52 IST

अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे

अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे. अल्प पावसामुळे मराठवाड्यातील कापसाचे क्षेत्र घटले तर विदर्भातील कापसाचे क्षेत्र मात्र ७० हजार हेक्टरने वाढले आहे. पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञाकरवी वर्तविण्यात येत आहे.यावर्षी राज्यात ४१ लाख ९१ हजार १४४ हेक्टरवर कपाशी पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. तथापि ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर म्हणजेच १०० टक्के पेरणी आटोेपली आहे. मराठवाड्यात मात्र कपाशीचे क्षेत्र घटले असून, पावसाच्या अनिश्चिततेमुळे लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात कापूस पेरणीवर परिणाम झाला आहे. मराठवाड्यात यावर्षी १७ लाख ७५ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात १४ लाख ८८ हजार हेक्टरवरच पेरणी झाली. उत्तर महाराष्ट्र खान्देशात ८ लाख ६० हजार १०१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशी पेरणी केली, तर विदर्भात सर्वात जास्त १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मराठवाड्यातील कपाशी पेरणीची झीज विदर्भ,खान्देशाने भरू न काढल्याने आकडेवारीवरू न दिसते.विदर्भातील अमरावती विभागातील शेतकºयांनी यावर्षी मूग,उडीद पिकांची पेरणी न करता कापूस पेरणीवर भर दिला तर नागपूर विभागातील शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कापूस पीक पेरणी केली.पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी शेतकºयांनी हा निर्णय घेतल्याचे कृषी तज्ज्ञाकरवी सांगण्यात येत असले तरी मागच्यावर्षीही पाऊस कमीच होता. तथापि, मागच्यावर्षीच्या खरीप हंगामातील कपाशी पिकाला जे दर मिळाले ते समाधानकारक होते. बोंडअळीचा प्रादुर्भावही कमी असल्याने कापसाची प्रत चांगली होती. यावर्षी मराठवाडा व विदर्भात खूपच कमी पाऊस झाला. विदर्भात कापूस पीक पेरणीला विलंब झाला. त्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारली.आताही पावसात दम नसून, काही भागात तुरळक तर काही भागात काहीच पाऊस नाही, अशी स्थिती आहे.याचा परिणाम कापूस उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

 अगोदर पाऊस लांबल्याने उशिरा पेरणी केलेल्या कपाशीची वाढ खुंटली होती. आता १२ दिवसांपासून ढगाळ वातावरण व अधूनमधून तुरळक पाऊस असून, शेतकºयांना पिकावर फवारणी करता येत नसल्याने अळ््या, कि डींचा प्रादुुर्भाव वाढत आहे.असेच वातावरण आणखी राहिल्यास कपाशी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.डॉ.मोहन खाकरे,माजी ज्येष्ठ विद्यावेत्ता,शास्त्रज्ञ,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी