शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पीक; मराठवाड्यात क्षेत्र घटले, विदर्भात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 13:52 IST

अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे

अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे. अल्प पावसामुळे मराठवाड्यातील कापसाचे क्षेत्र घटले तर विदर्भातील कापसाचे क्षेत्र मात्र ७० हजार हेक्टरने वाढले आहे. पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञाकरवी वर्तविण्यात येत आहे.यावर्षी राज्यात ४१ लाख ९१ हजार १४४ हेक्टरवर कपाशी पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. तथापि ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर म्हणजेच १०० टक्के पेरणी आटोेपली आहे. मराठवाड्यात मात्र कपाशीचे क्षेत्र घटले असून, पावसाच्या अनिश्चिततेमुळे लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात कापूस पेरणीवर परिणाम झाला आहे. मराठवाड्यात यावर्षी १७ लाख ७५ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात १४ लाख ८८ हजार हेक्टरवरच पेरणी झाली. उत्तर महाराष्ट्र खान्देशात ८ लाख ६० हजार १०१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशी पेरणी केली, तर विदर्भात सर्वात जास्त १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मराठवाड्यातील कपाशी पेरणीची झीज विदर्भ,खान्देशाने भरू न काढल्याने आकडेवारीवरू न दिसते.विदर्भातील अमरावती विभागातील शेतकºयांनी यावर्षी मूग,उडीद पिकांची पेरणी न करता कापूस पेरणीवर भर दिला तर नागपूर विभागातील शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कापूस पीक पेरणी केली.पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी शेतकºयांनी हा निर्णय घेतल्याचे कृषी तज्ज्ञाकरवी सांगण्यात येत असले तरी मागच्यावर्षीही पाऊस कमीच होता. तथापि, मागच्यावर्षीच्या खरीप हंगामातील कपाशी पिकाला जे दर मिळाले ते समाधानकारक होते. बोंडअळीचा प्रादुर्भावही कमी असल्याने कापसाची प्रत चांगली होती. यावर्षी मराठवाडा व विदर्भात खूपच कमी पाऊस झाला. विदर्भात कापूस पीक पेरणीला विलंब झाला. त्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारली.आताही पावसात दम नसून, काही भागात तुरळक तर काही भागात काहीच पाऊस नाही, अशी स्थिती आहे.याचा परिणाम कापूस उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

 अगोदर पाऊस लांबल्याने उशिरा पेरणी केलेल्या कपाशीची वाढ खुंटली होती. आता १२ दिवसांपासून ढगाळ वातावरण व अधूनमधून तुरळक पाऊस असून, शेतकºयांना पिकावर फवारणी करता येत नसल्याने अळ््या, कि डींचा प्रादुुर्भाव वाढत आहे.असेच वातावरण आणखी राहिल्यास कपाशी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.डॉ.मोहन खाकरे,माजी ज्येष्ठ विद्यावेत्ता,शास्त्रज्ञ,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी