शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

राज्यात यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 12:54 IST

यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते.

अकोला: राज्यात कापूस आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे; परंतु यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; पण हे सर्व बियाणे उपलब्धता आणि शेतकºयाची आर्थिक स्थिती यावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, टाळेबंदी आणि शेतकºयांचे बिघडलेले अर्थचक्र याचा परिणाम यावर्षी खरीप हंगामावर जाणवण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. खरिपात घेण्यात येणाºया पिकाचाही आढावा घेण्यात येत आहे. राज्यात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचे क्षेत्र ८० लाख हेक्टर आहे. गतवर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस बियाणे पेरणी करण्यात आली होती. यात विदर्भात १८ लाख हेक्टर क्षेत्र होते. गतवर्षी कापूस पीक बºयापैकी आले. त्यामुळे कापूस बियाण्याची उपलब्धता आहे; परंतु सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन बियाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता किती, यावर यावर्षी सोयाबीन पेरणीचे क्षेत्र अवलंबून आहे.  या सर्व पृष्ठभूमीवर यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते. टाळेबंदी आणि शेतकºयांचे झालेले अपरिमित नुकसान, या सर्व आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकºयांना सावरण्यासाठी पीक कर्जाचे आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे; परंतु विदर्भात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापूस पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी शेतकºयांना करावी लागेल.- डॉ. के. एस. बेग,कापूस तज्ज्ञ,स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृ षी विद्यापीठ, परभणी.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूस