शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पीक लागवडीचा खर्चही निघणार नाही; शेतकरी चिंतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 14:18 IST

सोयाबीन, कापूस व ज्वारी पिकांचे उत्पादन बुडाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे

- संतोष येलकरअकोला : पावसाळा संपल्यानंतर महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस व ज्वारी पिकांचे उत्पादन बुडाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे पीक लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर महिना उलटून गेला; मात्र परतीचा पाऊस बरसणे सुरूच आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत परतीच्या पावसाने कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. पात्या-फुलेही गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पावसाच्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाल्याच्या स्थितीत पिकांच्या पेरणी ते काढणीपर्यंत लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.पीक लागवडीचा असा आहे एकरी खर्च!यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस सुरू असल्याने पीक लागवडीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामध्ये पेरणी, डवरणी, निंदण, कीटनाशकांची फवारणी आणि कापणीपर्यंत सोयाबीन पिकाच्या लागवडीवर एकरी १३ ते १५ हजार रुपये, कपाशी पिकाच्या लागवडीवर एकरी २० ते २२ हजार रुपये आणि ज्वारी पिकाच्या लागवडीवर एकरी ६ ते ७ हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करावा लागला; परंतु परतीच्या पावसाने पिकांचे उत्पादन बुडाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याचे वास्तव आहे.शेतकºयांना आता मदतीची आस!परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून किती आणि केव्हा मदत मिळणार, याबाबत संकटात सापडलेल्या शेतकºयांना आता आस लागली आहे.परतीच्या पावसाने पिकांचे उत्पादन बुडाले आहे. पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने सरसकट एकरी २५ ते ३० हजार रुपये मदत दिली पाहिजे.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती