शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus : मुंबई, पुण्याहून आलेल्या ३,८५५ प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:45 IST

जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांत रविवारपर्यंत ३,८५५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत ४९६६ प्रवाशी आले आहेत. रविवारपर्यंत ३,८५५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.चौघांना पुढील संदर्भ सेवेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात विदेश, मुंबई, पुण्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांत रविवारपर्यंत ३,८५५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी दिली.राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या सहा ठिकाणांच्या जीम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटरही बंद ठेवण्यात आले. त्याशिवाय, रेल्वे, बस, खासगी प्रवासी बससेवाही बंद करण्यात आली. या परिस्थितीत त्या शहरांतून प्रवास करून परतणाºया ग्रामस्थांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९६६ प्रवाशी आले आहेत. रविवारपर्यंत ३,८५५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यांची तपासणी करण्यासाठी आशा वर्कर, आरोग्य सेविका, सेविका, वैद्यकीय अधिकारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत ठेवण्यात आले आहे.त्यापैकी चौघांना पुढील संदर्भ सेवेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील लग्नसमारंभ, सोहळे, यात्रा महोत्सव स्थगित करण्याच्या सूचनाही याआधीच देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात कोरोन प्रसार प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.ग्रामपंचायत अधिनियमातही प्रतिबंधाची उपाययोजनामहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १३९ अ नुसार कोरोना साथीवर नियंत्रण करण्याच्या उपाययोजना ग्रामपंचायतला कराव्या लागणार आहेत. विषाणूचा फैलाव थोपविण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करणे, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्या गृहभेटीद्वारे जनजागृती, उपचार व मार्गदर्शन करणे, शाळा, अंगणवाडी व सार्वजनिक मालमत्तांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस