शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

CoronaVirus : अकोल्यातील व्यापार क्षेत्र कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:42 IST

आगामी काळात केंद्र व राज्य शासनापुढे या संकटातून या क्षेत्राला सावरण्याचे आव्हान आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : आधीच आर्थिक मंदीचा सामना करत असलेले उद्योग व व्यापार क्षेत्र कारोना अन् लॉकडाउनमुळे धोक्यात आले आहे. कोरानाचा सामना करण्यासाठी सरकारने वेळीच घेतलेला लॉकडाउनचा हा निर्णय हा अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे; मात्र या लॉकडाउनचे मोठे परिणाम सर्वच क्षेत्रावर होणार असून, व्यापार व उद्योग क्षेत्राची आर्थिक घडीच विस्कटली जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात केंद्र व राज्य शासनापुढे या संकटातून या क्षेत्राला सावरण्याचे आव्हान आहे.लॉकडाउन सुरू असताना ग्रामीण भागासह शहरातील असंघटित कामगार, व्यापारी, कष्टकरी, मजूर वर्ग आता पुढे कसे होईल, या चिंतेने ग्रासलेले दिसत आहेत. अनेकांनी बँकांचे कर्ज घेतलेले आहे. त्याचे हप्ते भरण्याची अडचण होत आहे. दुसरीकडे या सर्वांना रोजगार पुरविणारे मोठे व्यापारीही संकटात आले आहेत. कष्टकरी, कामगार यांच्यासाठी शासनाने १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्यात रेशन मिळणार असले तरी इतर फायदे हे नोंदणीकृत मजूरवर्गासोबतच असंघटित कामगारांना मिळणे अपेक्षित होते. रेशन मिळाले तरी भाजीपाला, साखर-चहापत्ती, तेल व वीज बिल, मोबाइल, घरभाडे आदी इतर घरखर्चासाठी रोख पैसा लागणार आहे. ही समस्या एकदम जीवनावश्यक नसली तरी याने दैनंदिन जीवन विस्कळीत होणार आहे.अकोल्यातील व्यापार क्षेत्रावर ३ हजार २२५ कोटीचे कर्जअकोल्याची व्यापार व उद्योग क्षेत्र हे पश्चिम वºहाडातील सर्वात मोठे उद्योग क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये लावण्यात आलेल्या भांडवलापोटी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. एका अंदाजानुसार येथील उद्योग व्यापार क्षेत्रावर तब्बल ३ हजार २२५ कोटीचे कर्ज असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे क्षेत्रच ठप्प झाल्यामुळे या कर्जाची मुद्दल व व्याज उभारण्याचे मोठे आव्हान या क्षेत्रावर आहे.

दुकान भाड्यापोटी ७० कोटीचा खर्चशहर व जिल्हाभरातील व्यापारांची सर्वच दुकाने मालकीची नाहीत तसेच अतिक्रमणामध्ये लावण्यात येणारी दुकाने व हातगाड्या यांचीही अवैध भाडे वसुली सुरूच असते. अशा एकूण भाड्यापोटी तब्बल ६० ते ७० कोटीचा खर्च होत असतो.

हमाल, मजूरही बेरोजगारलॉकडाउनमुळे खासगी कर्मचारी, कामगार, हमाल हेसुद्धा अडचणीत आले आहेत. बाहेर जाता येत नाही अन् घरी बसून पोट भरत नाही अशा विचित्र अवस्थेत बेरोजगारीचे मोठे संकट त्यांच्यापुढे उभे आहे. अनेकांनी घर, दुचाकी, चारचाकी, व्यक्तिगत, व्यापारी कर्ज काढले असून, त्यांच्या हप्त्याचा भरणा कसा होणार, हाही मोठा प्रश्न आहे.

आधी सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, तरच इतर क्षेत्र राहतील. त्यामुळे या लॉकडाउनला सर्व व्यापार, उद्योग क्षेत्र सहकार्य करत आहे. हा लॉकडाउन जेव्हा संपेल तोपर्यंत हे क्षेत्र पूर्णत: कोलमडून जाईल. त्यासाठी अनेक अपेक्षा आहेत; मात्र तूर्तास बँकांच्या कर्जखात्यांना ‘एनपीए’च्या नियमातून किमान दोन महिने सवलत देणे गरजेचे आहे.- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला 

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस