शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात ९५९२ प्रवासी १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 18:05 IST

अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले.

अकोला: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात‘ लॉकडाऊन’ तर राज्यात संचारबंदी लागू झाली. या काळात म्हणजेच १० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत देशभरातून अकोला जिल्ह्यात १९०८१ प्रवासी दाखल झाले. त्या प्रवाशांची आरोग्य तपासणी ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये करण्यात आली. अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले. त्यापैकी ९४८९ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी उद्या सोमवारी पूर्ण होत आहे. उर्वरित ९५९२ प्रवाशांना १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’ ठेवण्यात आले. त्यांनी खबरदारी म्हणून या काळात घरातच राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो लोक कामानिमित्त देश, राज्यातील विविध शहरांमध्ये होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत गेला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी ठेवत त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये २२ मार्चपासून दैनंदिन येणाºया प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्यांपैकी सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २०६ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ३४ जणांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आले. तसेच १४ दिवसांपर्यंत ‘क्वारंटीन’ केलेल्यांची संख्या ६०३ एवढी आहे. त्याशिवाय, बाहेर जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या ४ एप्रिलपर्यंत १९२९६ एवढी झाली आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित केलेल्या प्रवाशांची संख्या २२० वर पोहोचली आहे. दर दिवशी आलेल्यांचाही ‘क्वारंटीन’ कालावधी निश्चित केला जात आहे.

- ‘क्वारंटीन’मध्ये असलेले प्रवासी२२ मार्च रोजी तपासणी झालेल्या तसेच ‘क्वारंटीन’मध्ये असलेल्या १०८० प्रवाशांचा कालावधी ५ एप्रिल रोजी पूर्ण झाला. २३ मार्च रोजीआलेल्या ३१८६ प्रवाशांचा उद्या ६ एप्रिल रोजी कालावधी संपुष्टात येत आहे. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्या एकूण प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी १७ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत ग्रामीण भागातील संबंधित प्रवासी व त्यांच्या कुटुंबीयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस