शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात ९५९२ प्रवासी १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 18:05 IST

अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले.

अकोला: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात‘ लॉकडाऊन’ तर राज्यात संचारबंदी लागू झाली. या काळात म्हणजेच १० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत देशभरातून अकोला जिल्ह्यात १९०८१ प्रवासी दाखल झाले. त्या प्रवाशांची आरोग्य तपासणी ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये करण्यात आली. अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले. त्यापैकी ९४८९ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी उद्या सोमवारी पूर्ण होत आहे. उर्वरित ९५९२ प्रवाशांना १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’ ठेवण्यात आले. त्यांनी खबरदारी म्हणून या काळात घरातच राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो लोक कामानिमित्त देश, राज्यातील विविध शहरांमध्ये होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत गेला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी ठेवत त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये २२ मार्चपासून दैनंदिन येणाºया प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्यांपैकी सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २०६ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ३४ जणांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आले. तसेच १४ दिवसांपर्यंत ‘क्वारंटीन’ केलेल्यांची संख्या ६०३ एवढी आहे. त्याशिवाय, बाहेर जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या ४ एप्रिलपर्यंत १९२९६ एवढी झाली आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित केलेल्या प्रवाशांची संख्या २२० वर पोहोचली आहे. दर दिवशी आलेल्यांचाही ‘क्वारंटीन’ कालावधी निश्चित केला जात आहे.

- ‘क्वारंटीन’मध्ये असलेले प्रवासी२२ मार्च रोजी तपासणी झालेल्या तसेच ‘क्वारंटीन’मध्ये असलेल्या १०८० प्रवाशांचा कालावधी ५ एप्रिल रोजी पूर्ण झाला. २३ मार्च रोजीआलेल्या ३१८६ प्रवाशांचा उद्या ६ एप्रिल रोजी कालावधी संपुष्टात येत आहे. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्या एकूण प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी १७ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत ग्रामीण भागातील संबंधित प्रवासी व त्यांच्या कुटुंबीयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस