शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात ९५९२ प्रवासी १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 18:05 IST

अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले.

अकोला: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात‘ लॉकडाऊन’ तर राज्यात संचारबंदी लागू झाली. या काळात म्हणजेच १० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत देशभरातून अकोला जिल्ह्यात १९०८१ प्रवासी दाखल झाले. त्या प्रवाशांची आरोग्य तपासणी ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये करण्यात आली. अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले. त्यापैकी ९४८९ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी उद्या सोमवारी पूर्ण होत आहे. उर्वरित ९५९२ प्रवाशांना १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’ ठेवण्यात आले. त्यांनी खबरदारी म्हणून या काळात घरातच राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो लोक कामानिमित्त देश, राज्यातील विविध शहरांमध्ये होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत गेला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी ठेवत त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये २२ मार्चपासून दैनंदिन येणाºया प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्यांपैकी सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २०६ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ३४ जणांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आले. तसेच १४ दिवसांपर्यंत ‘क्वारंटीन’ केलेल्यांची संख्या ६०३ एवढी आहे. त्याशिवाय, बाहेर जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या ४ एप्रिलपर्यंत १९२९६ एवढी झाली आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित केलेल्या प्रवाशांची संख्या २२० वर पोहोचली आहे. दर दिवशी आलेल्यांचाही ‘क्वारंटीन’ कालावधी निश्चित केला जात आहे.

- ‘क्वारंटीन’मध्ये असलेले प्रवासी२२ मार्च रोजी तपासणी झालेल्या तसेच ‘क्वारंटीन’मध्ये असलेल्या १०८० प्रवाशांचा कालावधी ५ एप्रिल रोजी पूर्ण झाला. २३ मार्च रोजीआलेल्या ३१८६ प्रवाशांचा उद्या ६ एप्रिल रोजी कालावधी संपुष्टात येत आहे. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्या एकूण प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी १७ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत ग्रामीण भागातील संबंधित प्रवासी व त्यांच्या कुटुंबीयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस