शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

CoronaVirus : पातुरातील ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 11:19 IST

शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

शिर्ला/पातूर : पातूरच्या सात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४० कोरोना संदिग्धांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ जणांपैकी सात जण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना अकोला सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तातडीने हलविण्यात आले होते. त्यांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ४७ पैकी सात पॉझेटिव्ह वगळता ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पातूर कोरोनामुक्त होण्याची प्रतीक्षा शिर्ला व पातूर येथील नागरिकांना आहे. दरम्यान, ३ हजार ९०५ कुटुंबातील २१ हजार २६८ नागरिक यापैकी एकही व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळले नाही. सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून दहशतीखाली वावरत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. २१ हजार २६८ नागरिक सर्व सीमा बंद केल्याने होम क्वारंटीन झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा मुक्त संचार थांबला आहे. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या थांबविण्यात आरोग्य विभाग, नगर प्रशासन, शिर्ला ग्रामपंचायत प्रशासन तथा पोलिसांना यश आले आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने कुणीही घराबाहेर पडू नका कारण कोरोनाला पातुरातून पळवायचे आहे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPaturपातूर