शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus : पातुरातील ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 11:19 IST

शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

शिर्ला/पातूर : पातूरच्या सात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४० कोरोना संदिग्धांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ जणांपैकी सात जण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना अकोला सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तातडीने हलविण्यात आले होते. त्यांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ४७ पैकी सात पॉझेटिव्ह वगळता ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पातूर कोरोनामुक्त होण्याची प्रतीक्षा शिर्ला व पातूर येथील नागरिकांना आहे. दरम्यान, ३ हजार ९०५ कुटुंबातील २१ हजार २६८ नागरिक यापैकी एकही व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळले नाही. सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून दहशतीखाली वावरत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. २१ हजार २६८ नागरिक सर्व सीमा बंद केल्याने होम क्वारंटीन झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा मुक्त संचार थांबला आहे. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या थांबविण्यात आरोग्य विभाग, नगर प्रशासन, शिर्ला ग्रामपंचायत प्रशासन तथा पोलिसांना यश आले आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने कुणीही घराबाहेर पडू नका कारण कोरोनाला पातुरातून पळवायचे आहे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPaturपातूर