शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला तीन हजार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST

सुरुवातीला काहींनी प्रशासनाकडून लग्न समारंभासाठी परवानगी घेतली; परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी परवानगी न घेताच १००० ते १५०० ...

सुरुवातीला काहींनी प्रशासनाकडून लग्न समारंभासाठी परवानगी घेतली; परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी परवानगी न घेताच १००० ते १५०० लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ केले. दररोज लग्न समारंभ उरकण्यात आले. ना तिथी, ना कोरोनाची भीती यात लग्न समारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. जिल्ह्यात एकही गाव शिल्लक नाही, त्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. जोमाने लग्न समारंभ पार पाडण्यात आले. डीजे, ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास तीन हजार लग्नसोहळे पार पडले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची नजर चुकवून लग्नसोहळे आयोजित करण्यात आले. याच वेळी कोरोना नियमांचे पालनही करण्याचा प्रयत्न झाला. या लग्न समारंभातून कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी आता कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे.

--बॉक्स--

२७३ जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल

येथील सह. दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालय यांच्याकडे वर्षभरात २७३ जोडप्यांनी लग्न झाल्याची नोंद केली आहे. हा आकडा कार्यालयापुरता असला तरी प्रत्यक्षात लग्नसोहळ्यांचा आकडा हजारांमध्ये असल्याचे जाणकार सांगत आहेत. विवाह नोंदणी करण्यास ग्रामीण भागात अद्याप उदासीनता दिसून येत आहे.

--बॉक्स--

एप्रिल कठीणच

वर्षभरात धूमधडाक्यात झालेल्या लग्न समारंभामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. ही परिस्थती सावरणे आता एप्रिल महिन्यात कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात ४ एप्रिलपासूनच सरकारने कडक निर्बंध लावले. त्यानंतर १५ एप्रिलपासून संचारबंदी लावली तरीही काही जण लग्न समारंभ करीतच आहेत.

--बॉक्स--

वर्षभरात ६१ लग्नतिथी

पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै दरम्यान ३२, तर नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान २९ लग्नतिथी आहेत; मात्र कोरोनाचा कहर सुरूच असल्याने व परवानगीची किचकट प्रक्रिया असल्याने अनेक जण लग्नसोहळे पुढे ढकलत असल्याचे दिसून येत आहे.

--कोट--

मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया

मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग असतानाही काही प्रमाणात व्यवसाय झाला; मात्र या उन्हाळ्यात व्यवसाय ठप्प आहे. एकही लग्न समारंभ मंगल कार्यालयात होत नाही. केवळ २५ लोकांची परवानगी असल्याने मंगल कार्यालयात लग्न समारंभ होत नाही.

- संदीप देशमुख, मंगल कार्यालय चालक

--कोट--

कमी लोकांत लग्न करायचे असेल तर मंगल कार्यालयात का लग्न करावे? असे लोकांना वाटले. मंगल कार्यालयात थाटामाटाने लग्न न करता घरीच लग्न करण्यात आले, त्यामुळे मंगल कार्यालयासोबत या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे मोठे नुकसान होत आहे.

- भैयासाहेब उजवने, मंगल कार्यालय चालक