शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

‘कोरोना’चा फटका: रक्त संकलन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:29 IST

रक्ताची गरज भागविण्यासाठी रक्तपेढ्यांचे लक्ष आता ग्रामीण भागाकडे लागून आहे.

अकोला : वाढते तापमान आणि कोरोनाचा प्रादुर्भाव, यामुळे जिल्ह्यातील रक्त संकलन घटले आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा दुष्काळ पडल्याने अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. रक्ताची गरज भागविण्यासाठी रक्तपेढ्यांचे लक्ष आता ग्रामीण भागाकडे लागून आहे.गत २० ते २२ दिवसांपासून जिल्ह्यात विशेषत: महापालिका क्षेत्रात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ३६२ वर पोहोचला आहे, तर दरदिवसाआड एकाचा कोरोनामुळे बळी जात आहे. या भयावह परिस्थितीत रक्तदातेही रक्तदान करण्यास टाळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मध्यंतरी जनजागृतीसह रक्त संकलनाच्या विविध पद्धतींचा अवलंब केल्याने रक्तदात्यांनीही प्रतिसाद देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध होता; परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि उन्हाचा तडाखा यामुळे अनेकजण रक्तदान करण्यास टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मर्यादित रक्तसाठा असल्याने डॉक्टरही अत्यावश्यक असेल, तरच रुग्णांवर शस्त्रक्रिया करीत आहेत. त्यामुळे रक्ताची गरज कमी झाली आहे; मात्र दुसरीकडे आवश्यकतेच्या तुलनेत रक्त संकलन घटले होते. त्यामुळे रक्तपेढ्यांसह रुग्णालयांचीही चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत रक्तपेढ्या रक्त संकलनासाठी ग्रामीण भागात शिबिर घेण्याचा विचार करीत आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील रक्तदात्यांनाही शिबिरासाठी आवाहन केले जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढी