शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘कोरोना’चे संकट वाढले; ‘लॉकडाऊन’ वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 16:25 IST

अकोला जिल्ह्यात १० एप्रिलपर्यंत कोरोनाचे १३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला असून, राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १३ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. त्यामुळे लागू असलेले ‘लॉकडाऊन’ वाढण्याची शक्यता आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यभरात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात १० एप्रिलपर्यंत कोरोनाचे १३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनाचे संकट वाढल्याच्या परिस्थितीत सध्या लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतही वाढ होण्याची शक्यता आहे. १४ एप्रिलनंतरही ‘लॉकडाऊन’ लागू ठेवल्यास जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यानुषंगाने करावयाच्या विविध उपाययोजना यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध यंत्रणांकडून उपाययोजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यानुसार ‘लॉकडाऊन’ मुदत वाढीच्या कालावधीत करावयाच्या विविध उपाययोजनांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहेत.कोरोना बाधित ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे प्रमाण वाढल्यास जिल्ह्यातील 'लॉकडाऊन'च्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस