शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

‘कोरोना’चे संकट वाढले; ‘लॉकडाऊन’ वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 16:25 IST

अकोला जिल्ह्यात १० एप्रिलपर्यंत कोरोनाचे १३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला असून, राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १३ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. त्यामुळे लागू असलेले ‘लॉकडाऊन’ वाढण्याची शक्यता आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यभरात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात १० एप्रिलपर्यंत कोरोनाचे १३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनाचे संकट वाढल्याच्या परिस्थितीत सध्या लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतही वाढ होण्याची शक्यता आहे. १४ एप्रिलनंतरही ‘लॉकडाऊन’ लागू ठेवल्यास जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यानुषंगाने करावयाच्या विविध उपाययोजना यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध यंत्रणांकडून उपाययोजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यानुसार ‘लॉकडाऊन’ मुदत वाढीच्या कालावधीत करावयाच्या विविध उपाययोजनांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहेत.कोरोना बाधित ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे प्रमाण वाढल्यास जिल्ह्यातील 'लॉकडाऊन'च्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस