शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

पीक कापणी प्रयोग कागदोपत्री केल्याच्या मुद्द्यावर वादंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ग्रामसेवकांनी पीक कापणी प्रयोग कागदोपत्री केल्याने, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ...

गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ग्रामसेवकांनी पीक कापणी प्रयोग कागदोपत्री केल्याने, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेता गोपाल दातकर यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या मागील सभेत विचारणा करीत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कृषी अधिकारी व सहायक गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. मात्र, ही चौकशीदेखील चुकीची आणि कागदोपत्री करण्यात आल्याचा आरोप करीत, संबंधित शेतकऱ्यांना सभेत बोलाविण्याची मागणी दातकर यांनी केली. त्यानुषंगाने चौकशी अहवालाची पडताळणी ४ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांना सभागृहात बोलाविण्याची परवानगी देण्यात आली नसल्याने संताप व्यक्त करीत शिवसेनेचे गोपाल दातकर व डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी सभात्याग केला. त्यामुळे पीक कापणी प्रयोगाच्या मुद्द्यावरून स्थायी समितीच्या सभेत चांगलेच वादंग रंगले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, समिती सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, डाॅ. प्रशांत अढाऊ, चंद्रशेखर चिंचोळकर, गजानन पुंडकर, प्रकाश आतकळ, रायसिंग राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या

ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करा!

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेती व पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर गावनिहाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात याव्यात आणि पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नाव यादीत नसल्यास अतिवृष्टीग्रस्त संबंधित शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्याची मागणी सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत केली. त्यानुषंगाने यासंदर्भात सभेत ठराव मंजूर करण्यात आला असून, हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.

कोरोना काळात म्हशींच्या खरेदीत

अनियमितता; चौकशीचे निर्देश !

कोरोना काळात गुरांचे बाजार बंद असताना, दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत बार्शिटाकळी पंचायत समिती अंतर्गत २५ म्हशींची खरेदी करण्यात आली असून, अनियमितता करण्यात आल्याचा आरोप करीत यासंदर्भात चौकशीची मागणी सदस्य ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत केली. त्यानुषंगाने यासंदर्भात दोन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.