शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

...तर महापालिका क्षेत्रात बांधकामांना मंजुरी नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:44 IST

बांधकामाची परवानगी देण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करा, अन्यथा त्याशिवाय बांधकामांचे आराखडे मंजूर न करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने जारी केले आहेत.

ठळक मुद्दे १०० चौरस मीटर क्षेत्रावरील सर्व प्रकारच्या बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करा, अन्यथा त्याशिवाय बांधकामांचे आराखडे मंजूर न करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने जारी केले आहेत.पावसाच्या पाण्यापैकी ५० टक्के पाणी थेट साठवण टाकीत जमा करणे आवश्यक आहे.

- आशिष गावंडेअकोला : महापालिका क्षेत्रात टोलेजंग व्यावसायिक इमारती, निवासी इमारती (फ्लॅट), डुप्लेक्स व डोळे दीपवणारे निवासस्थान उभारणाऱ्या मालमत्ताधारकांना बांधकामाची परवानगी देण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करा, अन्यथा त्याशिवाय बांधकामांचे आराखडे मंजूर न करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने जारी केले आहेत. त्यासाठी १ सप्टेंबरपासून नवा भूजल अधिनियम लागू केला जाणार आहे.भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घसरण होत चालली आहे. भूजल पातळीत घसरण होत असल्याचा सर्वाधिक फटका मराठवाडा व त्यापाठोपाठ पश्चिम विदर्भाला बसत असल्याचे समोर आले आहे. त्याची दाहकता यंदाच्या उन्हाळ्यात अकोलेकरांनी चांगलीच अनुभवली. महान धरणातील अत्यल्प जलसाठ्याचे नियोजन करताना मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपाच्या नाकीनऊ आले होते. शहरात भूजल अधिनियमाच्या निकषापेक्षा जास्त सबमर्सिबल पंप व हातपंपांची संख्या झाली असून, जवळपास ७० टक्के नागरिकांच्या घरी खासगी बोअर आहेत. मनपाच्या जलप्रदाय विभागाने अवाजवी समर्सिबल व हातपंपांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे अपेक्षित असताना कोट्यवधी रुपयांच्या देयकांचा मलिदा लाटण्याच्या उद्योगातून शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी सबमर्सिबल, हातपंप खोदण्यात आले. भविष्यात अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. अर्थात, जमिनीतून पाण्याचा बेसुमार उपसा होत असताना त्या बदल्यात जलपुनर्भरणाकडे प्रशासकीय यंत्रणांसह सर्वसामान्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती असल्याने त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र भूजल विकास प्राधिकरणने १०० चौरस मीटर क्षेत्रावरील सर्व प्रकारच्या बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.अन्यथा बांधकामाच्या १.२५ टक्के दंडपावसाच्या पाण्यापैकी ५० टक्के पाणी थेट साठवण टाकीत जमा करणे आवश्यक आहे. पाण्यावर पुन:प्रक्रिया व पुनर्वापर करण्याची सोय असावी, इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग असल्याची खात्री असल्याशिवाय इमारत मालकास भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, संबंधित व्यवस्था सहा महिन्यांच्या आत न केल्यास महापालिकेने ती स्वत: करून मालमत्ताधारकांकडून बांधकामाच्या १.२५ टक्के दंड वसूल करण्याचे निर्देश आहेत.....तोपर्यंत उद्योग, कारखाने बंद ठेवा!उद्योग, कारखान्यांमधून निघणारा घनकचरा व सांडपाण्यावर जोपर्यंत संबंधित उद्योजक-व्यावसायिक प्रक्रिया करीत नाहीत, तोपर्यंत असे उद्योग-कारखाने बंद ठेवण्याची तरतूद नव्या अधिनियमात करण्यात आली आहे. भूगर्भातील जलसाठा दूषित होणार नाही, याची काळजी घेणे बंधनकारक केले आहे. अशा उद्योगांना महापालिका प्रशासनाने नळ जोडणी देऊ नये, दिली असल्यास ती खंडित करावी, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियमात देण्यात आले आहेत.

नवा भूजल अधिनियम १ सप्टेंबर २०१८ पासून लागू केला जाणार आहे. भूजल पातळी वाढविणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यातून पळ काढल्यास भविष्यात दुष्काळाचा सामना करावा लागेल, ही बाब ध्यानात ठेवावी. कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल.-जितेंद्र वाघ,आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका