शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

लोकसभेतील पराभवाचे काँग्रेस करणार मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:39 IST

निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केली आहे.

अकोला: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ मधील निवडणुकीत पक्षाचे उमेदवार हिदायत पटेल यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. यंदा त्यामध्ये घसरण होऊन तिसºया क्रमांकाची मते मिळाली. पक्षाचा पराभव आणि संघटना बांधणीवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी क ाँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सतराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. दुसरीकडे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याने निवडणुकीत रंगत आली होती. दोन्ही उमेदवार भाजपच्या संजय धोत्रे यांच्यासह एक मेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे असले तरी दुसºया क्रमांकाची मते कोणाला मिळतात, यावर काँग्रेस आणि वंचित आघाडीत रस्सीखेच सुरू होती. २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत काँगे्रसचे हिदायत पटेल यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. त्यावेळी अ‍ॅड. आंबेडकर तिसºया क्रमांकावर होते. यंदा अ‍ॅड. आंबेडकर यांना दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसची पीछेहाट होऊन तिसºया क्रमांकाची मते मिळाली. ही बाब लक्षात घेता निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी पत्राद्वारे क ाँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याकडे केली आहे. या पत्राची दखल घेऊन बबनराव चौधरी बैठकीचे कधी आयोजन करतात, याकडे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या मतांमध्ये घसरणलोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजप उमेदवार संजय धोत्रे यांना ५ लाख ५४ हजार ४४४ मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर वंंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली, तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना तिसºया क्रमांकाची २ लाख ५४ हजार ३७० मते मिळाली. काँग्रेसच्या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतांचा आढावा घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवावर कारणमीमांसा करण्यासाठी गत आठवड्यात प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. त्या बैठकीला स्थानिक सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्याच विषयावर बैठक घेण्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले असून, लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल.-बबनराव चौधरी, शहर अध्यक्ष काँग्रेस.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसBabanrao Chaudharyबबनराव चौधरी