शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची वाट लावली - आदित्य ठाकरे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:18 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हाती सत्ता असताना १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची अक्षरश: वाट लावल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाडेगाव येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात सोडले

अकोला: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हाती सत्ता असताना १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची अक्षरश: वाट लावल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाडेगाव येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात सोडले. त्यांच्या काळात निर्माण झालेल्या विविध समस्या व अडचणींवर मात करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने पाच वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले असून, भविष्यातही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे भावनिक आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी ठोस प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आगामी निवडणुका लक्षात घेऊन जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले नाही. ही राजकीय यात्रा तर अजिबातच नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरभरून मतांचे दान आणि कौल दिला, त्याची जाणीव ठेवत आभार व्यक्त करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो असल्याचे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एरव्ही निवडणुका संपल्या की विजयी किंवा पराभूत उमेदवार फिरकतही नाहीत, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. शिवसेना याला अपवाद असून, दिलेल्या वचनांची पूर्ती करणारा पक्ष, अशी शिवसेनेची ओळख कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचारमुक्त प्रशासकीय व्यवस्था, उद्योग-व्यवसायांची पायाभरणी करण्यासोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावयाचा असेल, तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आम्ही सत्तेत असलो तरीही शेतमालाला हमीभाव मिळावा, याकरिता सतत आंदोलने केली. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. पीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया कंपन्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वठणीवर आणल्यामुळे कंपन्यांनी १० लाख शेतकºयांना विम्याची रक्कम दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकºयांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना कायम आग्रही आहे आणि राहील. वचन देतो की सरसकट कर्जमुक्तीशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढताच उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी व्यासपीठावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल सरप, विधानसभा संपर्क प्रमुख महादेवराव गवळे व सेवकराम ताथोड उपस्थित होते. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAkolaअकोलाShiv Senaशिवसेना