शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची वाट लावली - आदित्य ठाकरे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:18 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हाती सत्ता असताना १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची अक्षरश: वाट लावल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाडेगाव येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात सोडले

अकोला: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हाती सत्ता असताना १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची अक्षरश: वाट लावल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाडेगाव येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात सोडले. त्यांच्या काळात निर्माण झालेल्या विविध समस्या व अडचणींवर मात करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने पाच वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले असून, भविष्यातही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे भावनिक आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी ठोस प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आगामी निवडणुका लक्षात घेऊन जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले नाही. ही राजकीय यात्रा तर अजिबातच नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरभरून मतांचे दान आणि कौल दिला, त्याची जाणीव ठेवत आभार व्यक्त करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो असल्याचे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एरव्ही निवडणुका संपल्या की विजयी किंवा पराभूत उमेदवार फिरकतही नाहीत, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. शिवसेना याला अपवाद असून, दिलेल्या वचनांची पूर्ती करणारा पक्ष, अशी शिवसेनेची ओळख कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचारमुक्त प्रशासकीय व्यवस्था, उद्योग-व्यवसायांची पायाभरणी करण्यासोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावयाचा असेल, तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आम्ही सत्तेत असलो तरीही शेतमालाला हमीभाव मिळावा, याकरिता सतत आंदोलने केली. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. पीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया कंपन्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वठणीवर आणल्यामुळे कंपन्यांनी १० लाख शेतकºयांना विम्याची रक्कम दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकºयांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना कायम आग्रही आहे आणि राहील. वचन देतो की सरसकट कर्जमुक्तीशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढताच उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी व्यासपीठावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल सरप, विधानसभा संपर्क प्रमुख महादेवराव गवळे व सेवकराम ताथोड उपस्थित होते. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAkolaअकोलाShiv Senaशिवसेना