शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची वाट लावली - आदित्य ठाकरे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:18 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हाती सत्ता असताना १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची अक्षरश: वाट लावल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाडेगाव येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात सोडले

अकोला: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हाती सत्ता असताना १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची अक्षरश: वाट लावल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाडेगाव येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात सोडले. त्यांच्या काळात निर्माण झालेल्या विविध समस्या व अडचणींवर मात करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने पाच वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले असून, भविष्यातही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे भावनिक आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी ठोस प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आगामी निवडणुका लक्षात घेऊन जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले नाही. ही राजकीय यात्रा तर अजिबातच नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरभरून मतांचे दान आणि कौल दिला, त्याची जाणीव ठेवत आभार व्यक्त करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो असल्याचे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एरव्ही निवडणुका संपल्या की विजयी किंवा पराभूत उमेदवार फिरकतही नाहीत, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. शिवसेना याला अपवाद असून, दिलेल्या वचनांची पूर्ती करणारा पक्ष, अशी शिवसेनेची ओळख कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचारमुक्त प्रशासकीय व्यवस्था, उद्योग-व्यवसायांची पायाभरणी करण्यासोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावयाचा असेल, तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आम्ही सत्तेत असलो तरीही शेतमालाला हमीभाव मिळावा, याकरिता सतत आंदोलने केली. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. पीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया कंपन्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वठणीवर आणल्यामुळे कंपन्यांनी १० लाख शेतकºयांना विम्याची रक्कम दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकºयांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना कायम आग्रही आहे आणि राहील. वचन देतो की सरसकट कर्जमुक्तीशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढताच उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी व्यासपीठावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल सरप, विधानसभा संपर्क प्रमुख महादेवराव गवळे व सेवकराम ताथोड उपस्थित होते. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAkolaअकोलाShiv Senaशिवसेना