शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

अकाेल्यातून काँग्रेसचा खासदार निवडून येणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2023 15:23 IST

‘वंचित’च्या ‘इंडिया’तील प्रवेशावर प्रश्नचिन्ह, काेणी कुठे उभे राहावे, या क्षुल्लक कारणावरून मागील आठवड्यात प्रदेश पातळीवरील काॅंग्रेसचे अकाेल्यातील दाेन नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले हाेते.

राजरत्न सिरसाट

अकाेला : भाजपाविराेधात लढणाऱ्या प्रत्येक पक्षाचे काँग्रेस आघाडीत स्वागतच आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाेबतही चर्चा करण्यास तयार आहाेत. पंरतु, इंडिया आघाडीत येण्यासंदर्भात त्यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्ट करताना अकाेला लाेकसभा मतदार संघातून काँग्रेसचाच उमेदवार निवडून येइल, असा दावा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी करून ‘वंचित’च्या इंडिया आघाडीतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

वंचित बहुजन आघाडीची अकाेल्यात बुधवारी प्रचंड जंगी सभा झाल्यानंतर पटाेले यांनी शुकवार,२७ ऑक्टाेबर राेजी केलेला अकाेला जिल्हा दाैरा राजकीय वर्तुळात या निमित्ताने चर्चेचा ठरला आहे. माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांच्या इंडियातील प्रवेशावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी तुम्ही आमच्यात मध्यस्थी करा आणि जुळवून द्या, असा प्रतिप्रश्न केला. परंतु, भाजपाविराेधात जे जे आहेत त्यांना इंडिया आघाडीसाेबत घेऊन एकत्र लढणार असल्याची पुस्तीही पटाेले यांनी जाेडली.

शेतकऱ्यांचे प्रश्न जीवन मरणाचे असून, शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही, अतिवृष्टी, कमी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन मात्र या विषयाकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही, या पार्श्वभूमीवर येत्या नाेव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जिल्हा, तालुुकास्तरावर आंदाेलन केले जाणार असल्याचा माहिती त्यांनी दिली.

नेता कितीही माेठा असला तरी शिस्तीला महत्वकाेणी कुठे उभे राहावे, या क्षुल्लक कारणावरून मागील आठवड्यात प्रदेश पातळीवरील काॅंग्रेसचे अकाेल्यातील दाेन नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले हाेते. एका नेत्याने दुसऱ्या नेत्यावर यावेळी गंभीर आराेपही केले हाेते. या प्रकरणाची दखल नाना पटाेले यांनी घेतली असून, या प्रकरणात पिस्तूल निघाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण, काेणी कितीही माेठा नेता असला तरी पक्षशिस्तीला महत्व असल्याचे सांगत त्यांनी दाेन्ही नेत्यांना नाेटीस बजावली असल्याचे सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले