शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:44 IST

भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल.

- राजेश शेगोकारअकोला: दोन वर्षांपूर्वी अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष पदावर बबनराव चौधरी यांची नियुक्ती झाल्यानंतर येथील तरुण पदाधिकाऱ्यांनी एल्गार पुकारत या नियुक्तीला विरोध करून चक्क आत्मक्लेष आंदोलनही केले होते; मात्र काँग्रेसच्या हायकमांडने त्यांच्या निर्णयात कोणताही बदल केला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी उमेदवार निश्चित करताना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांच्याऐवजी शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्याची मागणीही बेदखल करण्यात आली तर अकोल्यातून मुस्लीम उमेदवार देऊ नये, या कार्यकर्त्यांच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. २०१४ च्या मोदी लोटेने गलितगात्र झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतून मनोबल देत कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचाच विचार केला गेला नाही. त्यामुळे २०१९ च्या दारुण पराभवानंतर काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे, असा प्रश्न अनेक पदाधिकाºयांच्या चर्चेतून समोर आला आहे.अकोल्यात गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसला स्वबळावर लोकसभा मतदारसंघ जिंकता आलेला नाही. भाजपाने लागोपाठ विजय मिळवित अकोल्याच्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आव्हानच मोडून काढले आहे. या पृष्ठभूमीवर पक्षाची विचारधारा जिवंत ठेवत काम करणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी ‘बदल’ होईल, या आशावादावर काम करीत होती. २०१९ मध्ये नव्या दमाचा उमेदवार देऊन काँगे्रस पक्ष कार्यकर्त्यांना चैतन्य देईल, ही अपेक्षा फोल ठरली अन् त्याच ठिकाणी काँग्रेसच्या पराभवाचा पाया रचला गेला. पटेल यांचे नाव जाहीर होताच, काँग्रेसच्या गोटातून सर्वांनीच काँग्रेसश्रेष्ठींच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. खासदार संजय धोत्रे यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याची ताकदच काँग्रेसची नव्हती. डॉ. अभय पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या उमेदवारीचे वारे मतदारसंघात फिरविले अन् ऐनवळी तांत्रिक कारणांनी घात झाल्याने पटेल यांच्या रूपाने मुस्लीम समाजाला खूश करण्याचा प्रयोग काँग्रेसने पुन्हा एकदा केला; मात्र हा प्रयोग काँग्रेसच्या विजयासाठी कमी अन् अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची कोंडी करण्यासाठी अधिक होता, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसनेच ‘काँग्रेस’चा ‘गेम’ केला आहे.खरे तर काँग्रेसचे संघटन केवळ कागदावरच उरले आहे. संघटनेत बदल नाही, नव्या चेहºयांना स्थान नाही, अजूनही सत्तेत आहोत अशा स्वरूपाच्या वागण्यात बदल नाही, दुसºया फळीची निर्मितीची नाही, अशी अनेक नकारात्मक कारणांची मोठी यादी सांगता येईल. मोदी लाट हे काँग्रेसच्या परिणामांचे एकमेव कारण नाहीच, भाकरी न फिरविणे हेही सर्वात मोठे कारण आहे. मोदी लाटेतही दुसरा क्रमांक टिकविणारी काँग्र्रेस आज तिसºया क्रमांकावर फेकली गेली आहे. याउलट मुस्लीम मतांमध्ये मोठे धु्रवीकरण न करताही अ‍ॅड. आंबेडकरांची ‘वंचित’ आघाडी दुसºया क्रमांकावर गेली. याचे कारण त्यांनी बदल केला. भारिप-बमसं पक्ष विलीन करण्याचीही हिंमत दाखविली. दुसरीकडे सर्वकाही संपले असतानाही काँग्रेस बदल स्वीकारायला तयार नाही. यामध्येही पराभवाचे कारण दडलेले आहे. भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल. एकाच निवडणुकीत बदल होईल, अशी अपेक्षा न ठेवता नव्या दमाची संघटना बांधावी लागेल. त्याची सुरुवात येत्या विधानसभा निवडणुकीत करावी लागेल. त्यासाठी ‘भाकरी’ फिरविणे हाच उपाय आहे, अन्यथा आज भाकरी करपली आहे म्हणून २२ टक्के मतदार तरी सोबत आहेत. उद्या भाकरी पूर्णपणे जळून गेल्यावर काँग्रेसचा पंजा उंचावयालासुद्धा ‘हात’ राहणार नाही!

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल