शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

केलेले काम जनतेपर्यंंत पोहोचविण्यात काँग्रेसला अपयश!

By admin | Updated: October 15, 2015 01:01 IST

मोदी सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे आणू, पत्रकार परिषदेत विनायकराव देशमुख यांचे वक्तव्य.

अकोला- काँग्रेसच्या कार्यकाळात गोर-गरिबांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्यात. या योजनांवर झालेले काम जनतेपर्यंंत पोहोचविण्यात काँग्रेसला अपयश आल्याची कबुली देत मोदी सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे आणू, असा इशारा काँग्रेसच्या योजना संनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी बुधवारी अकोला येथे दिला. काँग्रेसच्या संनियंत्रण समितीची सभा अकोला येथे न्यू राधाकिशन प्लॉटमधील अग्रसेन भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये समितीच्या कार्याबाबत चर्चा करण्यात आली. जनहितासाठी योजनांमध्ये आवश्यक बदल करण्याच्या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. त्यानंतर विनायकराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, विदर्भ आणि मराठवाड्यातील जनसेवकांची डिसेंबरमध्ये सभा आयोजित केली असल्याची माहिती दिली. त्यासाठी विदर्भात बुधवारपासून जिल्हानिहाय बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारकडून जनतेला खोटी आश्‍वासने दिली जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू असलेल्या योजनांची नावे बदलून आणि सामान्य जनतेला त्याचा फायदा मिळणार नाही, अशा पद्धतीने योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिष्यवृत्तीचे नियम बदल्याने ओबीसी विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागणार असल्याचे ते म्हणाले. विरोधासाठी विरोध नसून, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर बसलेले लोक इतिहासाची चाक उलटी फिरविण्याचा प्रयत्न करून लोकांची फसवणूक करीत आहेत. लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आता सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे मांडणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अमरावती विभागाचे प्रभारी श्याम उमाळकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, बबनराव चौधरी, अविनाश देशमुख, अनंत बगाडे, कपिल रावदेव, राजेंद्र कोळकर, महेश गणगणे, उषा विरक, वर्षा बडगुजर, आलमगीर खान आदींची उपस्थिती होती.