शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

केलेले काम जनतेपर्यंंत पोहोचविण्यात काँग्रेसला अपयश!

By admin | Updated: October 15, 2015 01:01 IST

मोदी सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे आणू, पत्रकार परिषदेत विनायकराव देशमुख यांचे वक्तव्य.

अकोला- काँग्रेसच्या कार्यकाळात गोर-गरिबांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्यात. या योजनांवर झालेले काम जनतेपर्यंंत पोहोचविण्यात काँग्रेसला अपयश आल्याची कबुली देत मोदी सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे आणू, असा इशारा काँग्रेसच्या योजना संनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी बुधवारी अकोला येथे दिला. काँग्रेसच्या संनियंत्रण समितीची सभा अकोला येथे न्यू राधाकिशन प्लॉटमधील अग्रसेन भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये समितीच्या कार्याबाबत चर्चा करण्यात आली. जनहितासाठी योजनांमध्ये आवश्यक बदल करण्याच्या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. त्यानंतर विनायकराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, विदर्भ आणि मराठवाड्यातील जनसेवकांची डिसेंबरमध्ये सभा आयोजित केली असल्याची माहिती दिली. त्यासाठी विदर्भात बुधवारपासून जिल्हानिहाय बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारकडून जनतेला खोटी आश्‍वासने दिली जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू असलेल्या योजनांची नावे बदलून आणि सामान्य जनतेला त्याचा फायदा मिळणार नाही, अशा पद्धतीने योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिष्यवृत्तीचे नियम बदल्याने ओबीसी विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागणार असल्याचे ते म्हणाले. विरोधासाठी विरोध नसून, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर बसलेले लोक इतिहासाची चाक उलटी फिरविण्याचा प्रयत्न करून लोकांची फसवणूक करीत आहेत. लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आता सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे मांडणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अमरावती विभागाचे प्रभारी श्याम उमाळकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, बबनराव चौधरी, अविनाश देशमुख, अनंत बगाडे, कपिल रावदेव, राजेंद्र कोळकर, महेश गणगणे, उषा विरक, वर्षा बडगुजर, आलमगीर खान आदींची उपस्थिती होती.