शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

युतीबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद नाही - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:15 IST

अकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्दे सोबत ‘एमआयएम’ असल्याने राज्यात बदल अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारिप बहुजन महासंघाने युती करताच मात्र जे सेक्युलर नाहीत, त्यांना पोटशूळ उठले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

- राजरत्न सिरसाटअकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.केंद्र, राज्यातील सरकारला जनता कंटाळली असून, जनतेलाच बदल हवा आहे. त्यादृष्टीने आम्ही जनतेसमोर पर्याय ठेवला आहे. वंचित बहुजन समाजाला सोबत घेऊन आम्ही राज्यात येत्या विधानसभेत चांगली कामगिरी करू न दाखवू. सोबत ‘एमआयएम’ असल्याने राज्यात बदल अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी राफेल विमान खरेदीबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत राहुल गांधी यांच्या बचावासाठी राज्यातील एकाही काँग्रेस नेत्याने बोलू नये, याचा अर्थ कार्यकर्ते काँग्रेसच्या बाजूने नाहीत, असा घ्यावा का, असा प्रश्नही अ‍ॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. मल्लिकार्जुन खडगे यांनी याबाबत व्यक्तिगत मत मांडले; पण वरिष्ठ नेते याबाबत अधिकृतपणे खंडन करायला तयार नाहीत, म्हणजे शरद पवारांनी उघड भूमिका घेऊनही राष्टÑवादी काँग्रेससोबत काँग्रेस युती करीत असेल, तर आता लोकांनीच यामागील निष्कर्ष काढावा, असे आवाहन त्यांनी केले.भारिप बहुजन महासंघाने ‘एमआयएम’सोबत युती केल्यानंतर अनेकांनी टीका केली, याबाबत त्यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. निवडणूक आयोगाने एमआयएम पक्षाची नोंदणी करू न मान्यता दिली, तेव्हा एमआयएम हा पक्ष सेक्युलर आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. भारिप बहुजन महासंघाने युती करताच मात्र जे सेक्युलर नाहीत, त्यांना पोटशूळ उठले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. कोरेगाव-भीमा प्रकरणात आम्ही आमचे म्हणणे आयुक्तांपुढे मांडले आहे. खरेतर या प्रकरणात लोकांंची साक्ष घेण्याअगोदर ज्या संघटना जबाबदार आहेत, त्यांची व सरकारी अधिकाऱ्यांची सुनावणी घेणे गरजेचे आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

 तो पवारांचा अहंकारशरद पवार यांनीच तुम्हाला निवडून आणल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यासंदर्भात आंबेडकर यांनी पवार यांचा तो अहंकार असल्याचे सांगितले. माणसात एवढाही अहंकार नसावा, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेसPoliticsराजकारण