शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

युतीबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद नाही - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:15 IST

अकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्दे सोबत ‘एमआयएम’ असल्याने राज्यात बदल अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारिप बहुजन महासंघाने युती करताच मात्र जे सेक्युलर नाहीत, त्यांना पोटशूळ उठले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

- राजरत्न सिरसाटअकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.केंद्र, राज्यातील सरकारला जनता कंटाळली असून, जनतेलाच बदल हवा आहे. त्यादृष्टीने आम्ही जनतेसमोर पर्याय ठेवला आहे. वंचित बहुजन समाजाला सोबत घेऊन आम्ही राज्यात येत्या विधानसभेत चांगली कामगिरी करू न दाखवू. सोबत ‘एमआयएम’ असल्याने राज्यात बदल अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी राफेल विमान खरेदीबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत राहुल गांधी यांच्या बचावासाठी राज्यातील एकाही काँग्रेस नेत्याने बोलू नये, याचा अर्थ कार्यकर्ते काँग्रेसच्या बाजूने नाहीत, असा घ्यावा का, असा प्रश्नही अ‍ॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. मल्लिकार्जुन खडगे यांनी याबाबत व्यक्तिगत मत मांडले; पण वरिष्ठ नेते याबाबत अधिकृतपणे खंडन करायला तयार नाहीत, म्हणजे शरद पवारांनी उघड भूमिका घेऊनही राष्टÑवादी काँग्रेससोबत काँग्रेस युती करीत असेल, तर आता लोकांनीच यामागील निष्कर्ष काढावा, असे आवाहन त्यांनी केले.भारिप बहुजन महासंघाने ‘एमआयएम’सोबत युती केल्यानंतर अनेकांनी टीका केली, याबाबत त्यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. निवडणूक आयोगाने एमआयएम पक्षाची नोंदणी करू न मान्यता दिली, तेव्हा एमआयएम हा पक्ष सेक्युलर आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. भारिप बहुजन महासंघाने युती करताच मात्र जे सेक्युलर नाहीत, त्यांना पोटशूळ उठले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. कोरेगाव-भीमा प्रकरणात आम्ही आमचे म्हणणे आयुक्तांपुढे मांडले आहे. खरेतर या प्रकरणात लोकांंची साक्ष घेण्याअगोदर ज्या संघटना जबाबदार आहेत, त्यांची व सरकारी अधिकाऱ्यांची सुनावणी घेणे गरजेचे आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

 तो पवारांचा अहंकारशरद पवार यांनीच तुम्हाला निवडून आणल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यासंदर्भात आंबेडकर यांनी पवार यांचा तो अहंकार असल्याचे सांगितले. माणसात एवढाही अहंकार नसावा, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेसPoliticsराजकारण