शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

‘पेयजल’ कंत्राटासाठी अटी शिथिल; निविदा प्रक्रियेदरम्यान गोंधळाने झाला  बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:26 IST

ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाची कायमस्वरूपी सोय म्हणून मु ख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्हय़ातून निवड केलेल्या व निधी मंजूर  असलेल्या नऊ योजनांच्या कामासाठी चालू केलेल्या निविदा प्रक्रियेत सतत  बदल केले जात आहेत. आतापर्यंत दोनवेळा शुद्धीपत्रक काढून कंत्राटदारांसाठी  पात्रतेच्या अटी व शर्ती शिथिल करण्याचा प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाने  केला आहे. 

ठळक मुद्देकंत्राटदार पात्र ठरण्यासाठी बदलपात्रता आणि अनुभवाच्या अटी रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाची कायमस्वरूपी सोय म्हणून मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्हय़ातून निवड केलेल्या व निधी मंजूर  असलेल्या नऊ योजनांच्या कामासाठी चालू केलेल्या निविदा प्रक्रियेत सतत  बदल केले जात आहेत. आतापर्यंत दोनवेळा शुद्धीपत्रक काढून कंत्राटदारांसाठी  पात्रतेच्या अटी व शर्ती शिथिल करण्याचा प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाने  केला आहे. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम २0१६-१७ ते २0१९-२0 या वर्षात राबविण्यात  येत आहे. त्यामध्ये अकोला जिल्हय़ातील १६ योजनांचे प्रस्ताव मंजूर आहेत.  त्यानुसार जिल्हा परिषदेने नऊ योजनांसाठी ११ कोटी ६१ लाख रुपये खर्चाचे  प्रस्ताव सादर केले. त्यातील काही प्रस्ताव रद्द झाले. त्यापैकी नऊ प्रस्तावांना  राज्यस्तरीय समितीने २४ एप्रिल २0१७ रोजी मंजुरी दिली. त्या गावांतील योजनांना एकूण ४ कोटी ६२ लाख ६३ हजार रुपये निधी मंजूर  करण्यात आला. ही कामे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून  करण्यासाठी निविदा प्रक्रियेला १९ ऑक्टोबर रोजी सुरूवात झाली. मात्र, त्यानंतर दोनवेळा शुद्धीपत्रक प्रसिद्ध करत योजनेच्या अटी व शर्तींमध्ये  फेरबदल करण्याचा सपाटा लावण्यात आला. हा प्रकार काही कंत्राटदारांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांसोबत  झालेल्या गदारोळानंतर झाला, हे विशेष. 

कंत्राटदार पात्र ठरण्यासाठी बदलनिविदेतून योजनेचे काम मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जाहिरा तीत प्रसिद्ध केलेल्या अटी व शर्तीनुसार अकोला जिल्ह्यातील कंत्राटदार पात्र  ठरण्याची शक्यता खूप कमी आहे. त्या कंत्राटदारांना पात्र ठरण्याची संधी  देण्यासाठी अटी व शर्ती शिथिल झाल्याची माहिती आहे. 

पात्रता आणि अनुभवाच्या अटी रद्दआधीच्या अटीनुसार निविदेत सहभागी होणार्‍या कंत्राटदाराला पात्र ठरण्यासाठी  पाणीपुरवठा योजना चालवण्याचा तीन महिने अनुभव, २४ महिने देखभाल व  दुरुस्ती, पूर्वी काम केल्याच्या अनुभवाची अट १८ नोव्हेंबर रोजीच्या शुद्धी पत्रकाने रद्द करण्यात आली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरWaterपाणी