शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कृषी समितीच्या सभेत दुष्काळाच्या सावटावर चिंता

By admin | Updated: July 15, 2014 00:59 IST

दुष्काळाच्या सावटावर सोमवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत चिंता व्यक्त करण्यात आली.

अकोला : पावसाळा सुरू होऊन, दीड महिन्याचा कालावधी उलटून जात आहे; मात्र अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या सावटावर सोमवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत चिंता व्यक्त करण्यात आली. गतवर्षीच्या अखर्चित ८२ लाखांच्या निधीतून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी तीन योजना राबविण्यासही या सभेत मंजुरी देण्यात आली. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन, दीड महिन्याचा कालावधी निघून गेला; मात्र दडी मारून बसलेला पाऊस अद्यापही बरसला नाही. पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यात खरीप पेरण्या खोळंबल्या असून, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या, आणखी काही दिवसात पाऊस न आल्यास निर्माण होणारी टंचाई परिस्थिती, मान्सून लांबल्याच्या परिस्थितीत पीक पेरणीत करावा लागणारा बदल, त्यासाठी करावे लागणारे नियोजन इत्यादी विषयांवर कृषी समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. पाऊस लांबल्याने होणार्‍या पावसाप्रमाणे पेरणीचे नियोजन करण्याबाबत गावागावांत शेतकर्‍यांना कृषी सहाय्यकांमार्फत माहिती देण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सभेत सांगितले. येत्या काही दिवसात पाऊस झाल्यास घ्यावयाची पिके आणि पेरणीसंदर्भात शेतकर्‍यांपर्यंंंत माहिती पोहोचविण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. सन २0१३-१४ मधील कृषी विभागाच्या अखर्चित ८२ लाखांच्या निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले असून, या निधीतून यावर्षी शेतकर्‍यांसाठी तीन योजना राबविण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. या योजनांचा विषय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्याची शिफारस या सभेत करण्यात आली. कृषी सभापती रामदास मालवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य मंजुळा लंगोटे, डॉ.हिंमत घाटोळ, रमन जैन, शबाना खातून सैफुल्ला खान, देवका पातोंड, रेणुका दातकर यांच्यासह प्रभारी कृषी विकास अधिकारी बी.एन. गांधी व कृषी विभाग आणि महाबीजचे अधिकारी सभेला उपस्थित होते.