शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अनुकंपा उमेदवार, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पदभरतीची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:55 IST

अकोला : ग्रामपंचायत कर्मचाºयांमधून १० टक्के कर्मचारी तसेच पात्र ठरलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या पदभरतीला राज्यभरातील जिल्हा परिषदांनी मागील चार वर्षांपासून ‘ब्रेक’ लावला आहे.

 - आशिष गावंडे,अकोला : ग्रामपंचायत कर्मचाºयांमधून १० टक्के कर्मचारी तसेच पात्र ठरलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या पदभरतीला राज्यभरातील जिल्हा परिषदांनी मागील चार वर्षांपासून ‘ब्रेक’ लावला आहे. पदभरती प्रक्रियेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने डोक्याला कटकट नको, या धोरणातून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सरळसेवेच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया बाजूला सारल्याची परिस्थिती आहे. या प्रकारामुळे अनुकंपासाठी पात्र असलेल्या असंख्य उमेदवारांची वयोमर्यादा कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामविकास विभागाने ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.कर्मचाºयांच्या अपुºया संख्येमुळे जिल्हा परिषदांचे कामकाज प्रभावित होत असल्याची जाणीव असतानासुद्धा ग्रामविकास विभागासह राज्यभरातील मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वर्ग-३ व वर्ग-४ च्या जिल्हा संवर्गातील रिक्त पदांचा अनुशेष दूर न करता त्याला खोळंबा घातल्याचा प्रकार दिसून येत आहे. ग्रामपंचायतमध्ये सलग दहा वर्षांपासून सेवारत कर्मचाºयांची जिल्हा परिषदेत वर्ग-३ व वर्ग-४ च्या रिक्त एकूण पदांच्या १० टक्के इतक्या पदांवर नियुक्त करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला. हाच निकष अनुकंपासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांबाबतही लागू करण्यात आला. सदर कर्मचाºयांच्या बाबतीत राज्य शासनाचे व मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे कातडी बचाव धोरण नियुक्तीसाठी पात्र असलेल्या कर्मचाºयांच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने दरवर्षी ग्रामपंचायतमधील तसेच अनुकंपाधारक उमेदवारांची टप्प्या-टप्प्याने नियुक्ती करणे क्रमप्राप्त असताना त्याला शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे आडकाठी निर्माण झाल्याचे दिसत आहे. पदभरती प्रक्रियेत अनियमितता होण्यासोबतच संशयाच्या घेºयात उभे राहण्याच्या धास्तीपोटी जिल्हा परिषदांच्या ‘सीईओं’नी या विषयाला पद्धतशीर बाजूला सारल्याचे दिसून येते. मागील चार वर्षांच्या कालावधीत पश्चिम विदर्भातील तसेच इतर जिल्हा परिषद प्रशासनाने वर्ग-३ व वर्ग-४ च्या रिक्त पदांची पदभरती न केल्यामुळे रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. यासंदर्भात शासन व जि.प.च्या ‘सीईओं’नी तातडीने नियुक्ती प्रक्रिया राबविण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

निर्णय घेताना गोंधळाची स्थिती!२५ मे २०१७ च्या निर्णयानुसार सुधारित आकृतिबंध मंजूर केल्याशिवाय नवीन पद निर्मिती तसेच पदभरती न करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानंतर १६ मे २०१८ च्या शासन निर्णयानुसार ही अट मागे घेऊन सरळसेवेच्या रिक्त पदांच्या १०० टक्के पदभरतीसाठी जुन्या आकृतिबंधानुसार पदभरती करण्याचे निर्देश दिले होते. अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांच्या बाबतीत १ जानेवारी २०१७ व नंतर १५ फेब्रुवारी २०१८ मध्ये घेतलेले निर्णय मागे घेऊन १६ मे २०१८ मधील नवीन निर्णय पाहता जि.प.तील पदभरतीसंदर्भात ग्रामविकास विभागाची गोंधळाची स्थिती समोर येते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायतEmployeeकर्मचारी